शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

उल्हासनगर महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन सुरूच 

By सदानंद नाईक | Updated: August 13, 2023 16:13 IST

महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न कायद्याने वागा संघटनेचे राज असंरोंडकर यांनी उचलून गेल्या महिन्यांपूर्वी उपोषण केले होते.

उल्हासनगर : महापालिका कंत्राटी कामगाराच्या चौकशी समितीचा अहवाल देत नसल्याच्या निषेधार्थ कायद्याने वागा संघटनेच्या राज असरोंडकर यांच्यासह कंत्राटी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच अहवालाची प्रत मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचे संकेत असरोंडकर यांनी दिले असून महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मात्र ७ ते ८ दिवसात अहवालाची प्रत देणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

 उल्हासनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वाहन विभाग, सुरक्षा विभाग, अग्निशमन दल विभाग आदी विभागात ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार विविध ठेकेदारा मार्फत घेतले आहे. मनुष्यबळ पुरविणाऱ्या काही ठेकेदारांची नोंदणी कामगार आयुक्त यांच्याकडे नसतांना कामगार पुरविण्याचा महापालिकेने दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. शासन नियमानुसार कंत्राटी कामगारांना वेतन मिळत नसल्याने, कंत्राटी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला. यामध्ये महापालिका अधिकारी व ठेकेदार संगनमत करून कंत्राटी कामगारांची पिळवणूक करीत असल्याचा आरोपही केला आहे. 

महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न कायद्याने वागा संघटनेचे राज असंरोंडकर यांनी उचलून गेल्या महिन्यांपूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन देऊन समितीच्या अहवालानंतर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अध्यापही चौकशी समितीचा अहवाल आला नसल्याने, असरोंडकर यांनी चौकशी समितीच्या अहवालाची मागणी करून महापालिके समोर कंत्राटी कामगारा सोबत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले. कोरोना काळात स्वतःसह घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या वॉर्डबॉय यांचा ठेका रद्द करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली. अशी टीकाही सर्वस्तरातून होत आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महापालिकेचे रुग्णालयाचे खाजगीकरण केले जात आहे. 

ठेकेदार व अधिकाऱ्यांचे बिंग फुटणार महापालिका कंत्राटी कामगारांना शासन नियमानुसार कमी वेतन दिल्याचा प्रकार उघड होऊन, पगारातील फरक द्यावा लागणार आहे. गेल्याच आठवड्यात कार्यरत एकून ८३ कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी गेल्या तीन वर्षात एकही सुट्टी घेतली नसल्याचा प्रकार उघड झाल्याने, महापालिकेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. तर इतर कंत्राटी कामगारांमुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांचे बिंग फुटणार असल्याचे बोलले जात आहे.