शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उल्हासनगरातील खचलेल्या डोंगराला संरक्षण भिंत बांधणार; पालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 17:22 IST

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, पावसाने धुमाकूळ घातला. संततधार पावसाने धोबीघाट येथील डोंगर खचून डोंगराच्या किनाऱ्यावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेले होते.

- सदानंद नाईक उल्हासनगर : धोबीघाट येथील खचलेल्या डोंगराला सरंक्षण भिंत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. संततधार पावसाने डोंगरावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेल्याची घटना घडली होती. तसेच गेल्या आठवड्यात महापालिकेने काही घरांना नोटिसा दिल्या होत्या.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, पावसाने धुमाकूळ घातला. संततधार पावसाने धोबीघाट येथील डोंगर खचून डोंगराच्या किनाऱ्यावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेले होते. सावधगिरीचा उपाय म्हणून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी १२ पेक्षा जास्त घरांना नोटिसा देऊन घरे खाली करण्याचे सांगितले. याप्रकारने स्थानिक नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. धोकादायक इमारत व पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांना पर्यायी जागा देत असताना, डोंगरावरील नागरिकांना वेगळा न्याय का? असा प्रश्न मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी महापालिकेला करून डोंगरकडेला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली. 

अखेर महापालिकेने संरक्षण भिंत बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती शेख यांनी दिली. महापालिकेचे शहर अभियंता महेश शितलानी यांनी आयुक्त, विभागाचे उपायुक्त यांच्या आदेशानुसार डोंगरकडेला संरक्षण भिंत बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती दिली. तर डोंगर कडेवरील नागरिकांनी समाधान व्यक्त करून पर्यायी घरे देण्याची मागणी केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर