शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

सुरक्षा पुलाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे

By admin | Updated: March 12, 2016 01:58 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील उच्छेली-दांडी, नवापूर, पाम, मुरबे, तारापूर इ. परिसरांतील लोकांना सुरक्षित

हितेन नाईक,  पालघरतारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील उच्छेली-दांडी, नवापूर, पाम, मुरबे, तारापूर इ. परिसरांतील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या दृष्टीने दांडी-नवापूर आणि मुरबे खारेकुरण हे दोन पूल उभारणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरने राज्यासह केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविला असून लवकरच या पूल उभारणीबाबत शुभवर्तमान ऐकावयास मिळणार असल्याची माहिती पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी लोकमतला दिली.मुरबे व खारेकुरण या दोन गावांमधून वाहणाऱ्या खाडीवर पूल बांधणे अत्यंत गरजेचे असून पूल उभारण्याची मागणी १९५८ पासून येथील स्थानिक जनता करीत असून वेळोवेळी या मागणीचा पाठपुरावा संबंधित लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, अधिकारीवर्ग करीत आहेत. अणुऊर्जा प्रकल्पात एखाद्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पुलांची उपयुक्तता पाहून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ते सर्वेक्षण पूर्ण करून या दोन्ही पुलांचे आराखडे व नकाशे (डिझास्टर एव्याकुशन प्लॅन) यांना मान्यताही देऊन हे प्रकरण देशाचे पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे. या पुलाच्या उभारणीच्या निधीसाठी भक्कम पाठपुराव्याची आवश्यकता असून खासदार, आमदार यांची राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पुलाच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली असून पोटनिवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्याच्या विकासाचे आश्वासन देऊन गेलेले शिंदे या पुलाच्या उभारणीकामी सरकारमध्ये आपले किती वजन खर्ची घालतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २ हे १९६९ साली कार्यान्वित झाल्यानंतर सन २०१०-११ मध्ये ३ आणि ४ वाढीव आण्विक रिअ‍ॅक्टर कार्यान्वित झाले. या दरम्यानच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रकल्प-१ आणि २ ची कालमर्यादा पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील २० ते २५ किमी परिसरातील तारापूर, पोफरण, चिंचणी, डहाणू, पाम, कुंभवली, नवापूर, नांदगाव, मुरबे, सातपाटी, माहीम, केळवे इ. शेकडो गावे बाधित होऊन मोठा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास परिसरातील लोकांना संरक्षित ठिकाणी पोहोचवणे गरजेचे ठरणार आहे. परंतु, ४७ वर्षांच्या कालावधीमध्ये दरवर्षी फक्त आपत्कालीन व्यवस्थेचे डेमो सादर करण्यापलीकडे अणुऊर्जा प्रशासन आणि शासन यांना विशेष काहीही उपाययोजना करण्यात यश आल्याचे दिसून येत नाहीत. हे इथून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अपयश म्हणावे लागेल.> 1सध्या तारापूर ते बोईसरमार्गे अहमदाबाद महामार्गाकडे आणि पालघरकडे जाणाऱ्या रस्त्याव्यतिरिक्त अन्य मार्ग नसून एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी उसळलेल्या गर्दीला रोखणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे. तारापूर औद्योगिक परिसरात १२०० च्या आसपास कारखाने असून त्या करखान्यात रोजगारासाठी येणारा वर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. 2आपत्कालीन परिस्थिती उत्पन्न झाल्यास कमीतकमी जीवितहानी व्हावी, यासाठी उच्छेली दांडी-नवापूर आणि मुरबे-खारेकुरण हे दोन खाडीवरील पूल तत्काळ बांधणे गरजेचे बनले आहे. या पुलांच्या निर्मितीमुळे दांडी-नवापूर-मुरबे-खारेकुरण येथून थेट पालघर, मनोरमार्गे अहमदाबाद महमार्गाला थोड्याच कालावधीत जाता येणार आहे. तर, काहींना माहीम, केळवे, सफाळे येथून तांदूळवाडी पुलावरून वसई-ठाणे, मुंबईच्या दिशेने जाता येणार आहे.3या प्रकल्पामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल, डिझेल इंधनाची बचतही होणार आहे. तसेच स्थानिक शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांचा उत्पादित माल कमीतकमी वेळेत मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचून त्यांच्या मालाला रास्त भाव मिळणार आहे. यासाठी गरज आहे ती लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या वचनांचे काय झाले हे लवकरच कळेल.