शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

उल्हासनगर महापालिका निवडणुकीपूर्वी स्टेशन नामांतर गाजणार?; महासभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:48 IST

सोशल मीडियावर मात्र टीकेची झोड, उल्हासनगर महापालिका निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली असून राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवक सक्रिय झाले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महासभेत उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड या तिन्ही रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचे प्रस्ताव आले. आलेल्या प्रस्तावावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली असून शहर विकासावर अश्या नगरसेवकांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली असून राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवक सक्रिय झाले. शहरातील नागरिक पाणी टंचाई, साफसफाईचा बोजवारा, रस्त्याची दुरावस्था आदी मूलभूत समस्यांनी ग्रस्त असतांना, काही नगरसेवकांनी उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदली करण्याचा अशासकीय प्रस्ताव महापालिका महासभेत आणला आहे. गुरवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी महापालिका महासभा असून सर्वांचे लक्ष अशासकीय प्रस्तावाकडे लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर टीकेची झोड उठली. भाजपचे नगरसेवक राजेश वानखडे व शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्सना जाधव यांनी उल्हासनगर रेल्वे स्टेशनचे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करा. असा अशासकीय प्रस्ताव आणला आहे. 

राष्ट्रवादीमय झालेले भाजपचे दुसरे स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांनी पक्षाच्या लेटरपत्रावर लक्षवेधी सुचनेद्वारे महापालिका हद्दीतील शहाड रेल्वे स्टेशनला संत भगत कंवाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. प्रस्तावाला एकमताने मंजुरी देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे सुचविले. तर दुसरीकडे शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारतीचे स्लॅब पडून अनेकांचे बळी दरवर्षी जात आहेत. तसेच शेकडो जण बेघर होत आहेत. पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, तुंबलेल्या नाल्या, ओव्हरप्लॉ झालेली भुयारी गटारे, डम्पिंग ग्राऊंड, साफसफाईचा बोजवारा, अवैध बांधकामे, अर्धवट विकास कामे आदींमुळे शहर भकास झाले. मात्र या मूलभूत समस्या सोडविण्या ऐवजी नगरसेवक रेल्वे स्टेशनच्या नामांतराचे प्रस्ताव महापालिका महासभेत आणून शहरवासीयांचे लक्ष विचलित करीत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर