शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उल्हासनगर महापालिका निवडणुकीपूर्वी स्टेशन नामांतर गाजणार?; महासभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 16:48 IST

सोशल मीडियावर मात्र टीकेची झोड, उल्हासनगर महापालिका निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली असून राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवक सक्रिय झाले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महासभेत उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड या तिन्ही रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचे प्रस्ताव आले. आलेल्या प्रस्तावावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली असून शहर विकासावर अश्या नगरसेवकांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली असून राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवक सक्रिय झाले. शहरातील नागरिक पाणी टंचाई, साफसफाईचा बोजवारा, रस्त्याची दुरावस्था आदी मूलभूत समस्यांनी ग्रस्त असतांना, काही नगरसेवकांनी उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदली करण्याचा अशासकीय प्रस्ताव महापालिका महासभेत आणला आहे. गुरवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी महापालिका महासभा असून सर्वांचे लक्ष अशासकीय प्रस्तावाकडे लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर टीकेची झोड उठली. भाजपचे नगरसेवक राजेश वानखडे व शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्सना जाधव यांनी उल्हासनगर रेल्वे स्टेशनचे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करा. असा अशासकीय प्रस्ताव आणला आहे. 

राष्ट्रवादीमय झालेले भाजपचे दुसरे स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांनी पक्षाच्या लेटरपत्रावर लक्षवेधी सुचनेद्वारे महापालिका हद्दीतील शहाड रेल्वे स्टेशनला संत भगत कंवाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. प्रस्तावाला एकमताने मंजुरी देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे सुचविले. तर दुसरीकडे शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारतीचे स्लॅब पडून अनेकांचे बळी दरवर्षी जात आहेत. तसेच शेकडो जण बेघर होत आहेत. पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, तुंबलेल्या नाल्या, ओव्हरप्लॉ झालेली भुयारी गटारे, डम्पिंग ग्राऊंड, साफसफाईचा बोजवारा, अवैध बांधकामे, अर्धवट विकास कामे आदींमुळे शहर भकास झाले. मात्र या मूलभूत समस्या सोडविण्या ऐवजी नगरसेवक रेल्वे स्टेशनच्या नामांतराचे प्रस्ताव महापालिका महासभेत आणून शहरवासीयांचे लक्ष विचलित करीत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर