शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सूतिकागृहाचा प्रस्ताव दुर्लक्षित?

By admin | Updated: September 15, 2015 23:08 IST

शहरातील मध्यवर्ती भागात टिळकपथावर केडीएमसीच्या सूतिकागृहाची वास्तु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या वास्तूला नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करुन ठेवले आहे.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहरातील मध्यवर्ती भागात टिळकपथावर केडीएमसीच्या सूतिकागृहाची वास्तु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या वास्तूला नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करुन ठेवले आहे. आता तर ती पडीक, दुर्लक्षित वास्तू असून ते सूतिकागृह आहे की खंडहर असा प्रश्न निर्माण होत आहे. भटकी कुत्री, उंदीर-घुशींसह, झाडा-झुडपांचा कचरा, यामुळे ती वास्तू बकाल झाली आहे. परिणामी डासांसह अन्य प्रार्दुभावाचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. महापालिकेने ते एखाद्या ट्रस्टला द्यावे, तोच त्याचे बांधकाम करेल व अद्ययाबत सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल साकारेल, असा प्रस्ताव येथील नगरसेवकाने महापालिकेच्या अधिका-यांना दिला होता. परंतु त्याकडे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याच वॉर्डात नेहरु मैदान हे महापालिकेचे खेळाचे एकमेव मैदान आहे. त्या मैदानाचाही विकास करण्यात यावा असा प्रयत्न नगरसेवकाने केला होता, परंतु तोही धुळखात पडला होता. आता कुठे त्या संदर्भातील कागदपत्रे एका टेबलावरुन दुस-या टेबलावर पुढे सरकत आहेत. या व्यतिरीक्त परिसरात मनोरंजनाचे ठिकाण नाही. सुमारे ९ हजार लोकवस्ती असून बहुतांशी रहीवासी हे उच्चभ्रू आहेत. बहुतांशी नागरिकांकडे चारचाकी वाहने आहेत, परंतु इमारती जुन्या प्लॅनिंगच्या असल्याने या ठिकाणची वाहने ही रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे आधीच गल्लीबोळातले रस्ते वाहने उभी असल्याने आणखीनच अरुंद होत आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असून त्यासाठी जागा नसल्याचे सांगण्यात आले. कचराकुंडी मुक्त वॉर्ड अद्यापही झालेला नाही. नेहरु मैदानातील एका कडेला असलेली कुंडी हटता हटत नसल्याने नगरसेवकाच्या नाकीनऊ आले आहेत. येथिल अंतर्गत रस्त्यांवर केडीएमटी येत नाही. हा भाग स्थानकालगत असल्याने परिवहनाची गरजही नाही. फडके रोडनजीक फेरीवाल्यांचा प्रश्न भेडसावत आहे. याच ठिकाणी विशिष्ट समाजाचीही वस्ती असून त्या ठिकाणी कच-याची समस्या गंभीर आहे. तेथील रहिवासी स्वत:च कचरा रात्रीतच घराबाहेर टाकतात. त्यामुळे तेथे भटकी कुत्री जातात, अनेकदा त्यामुळेही आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. वॉर्डात पाण्याची समस्या नाही. काही अपवाद वगळता कचराही नाही. सूतिकागृहा संदर्भात प्रस्ताव तीन-चार आयुक्तांसमोर ठेवला, पण त्याचे काहीच झाले नाही. रस्ते अरुंद असल्याने आता बाजुला असलेल्य गटारी रस्त्याच्या लेव्हलला आणल्या असून त्या जागेत चारचाकींचे पार्किंग होणार. एकही वाचनालय बंद नाही हे विशेषच आहे. - प्राजक्त पोद्दार, नगरसेवक