शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मालमत्ता कर थकवला : कापडप्रक्रिया कारखान्यांना सील ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:32 IST

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कापडप्रक्रिया क्षेत्रातील डार्इंग, सायझिंग व पॉवरलूम कारखानदारांनी गेल्या नऊ वर्षांतील जवळपास २७ कोटींचा मालमत्ता कर थकवला असून तो सात दिवसांत भरण्याची मुदत पालिकेने दिली आहे.

भिवंडी : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कापडप्रक्रिया क्षेत्रातील डार्इंग, सायझिंग व पॉवरलूम कारखानदारांनी गेल्या नऊ वर्षांतील जवळपास २७ कोटींचा मालमत्ता कर थकवला असून तो सात दिवसांत भरण्याची मुदत पालिकेने दिली आहे. तोवर तो कर पालिकेत जमा न केल्यास सरकारी नियमानुसार पोलिसांना सोबत घेत हे कारखाने सील केले जातील, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पालिकेतील बैठकीत दिला.भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या एक ते पाच प्रभागाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने पॉवरलूम कारखाने आहेत. तसेच कापडावर प्रक्रि या करणारे १३५ सायझिंग व डार्इंग कारखाने आहेत. यातील बहुसंख्य डार्इंग व सायझिंग चालकांनी वर्षानुवर्षे पालिकेचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्याचप्रमाणे डार्इंग कारखान्यातून निर्माण होणाºया ओल्या व सुक्या कचºयाची विल्हेवाट लावण्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही, असे पालिकेच्या निदर्शनास आले. या प्रकरणी नागरिकांनी पालिकेकडे केलेल्या तक्रारीनुसार बहुसंख्य कापड कारखाने, डार्इंग व सायझिंगच्या आवारात अनाधिकृत बांधकामे केली आहेत. परंतु त्याची करआकारणी वसुली विभाग व दिगरबाद विभागाने केलेली नाही. या तक्रारी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे जाताच त्यांनी शहरातील पॉवरलूमधारक,सायझिंग व कापड डार्इंगच्या व्यावसायिकांची महापौर जावेद दळवी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेतली.महापौर दालनात झालेल्या बैठकीत कापड कारखाने, सायझिंग व डार्इंगमधून मोठ्या प्रमाणांत कचरा टाकला जात असल्याचा विषय समोर आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरभर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. असे असताना अनेक ठिकाणी कापड कारखान्याबाहेर प्रचंड प्रमाणात कचरा साठलेला दिसून येतो. या कचºयाचे विघटन करणे अथवा त्याची विल्हेवाट लावणे हे व्यापाºयांचे व व्यावसायिकांचे काम आहे. ते तसे करत नसल्याने स्वच्छतेची मोहीम अयशस्वी होते आहे. त्याला तेच कारणीभूत आहेत. यासाठी डार्इंग व सायझिंग चालक व मालकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,असे मत महापौर जावेद दळवी यांनी व्यक्त केले. डार्इंग व सायझिंगमधून निघणाºया कचºयाची विल्हेवाट योग्यरित्या लावण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी कचराकुंडयÞा डार्इंग कारखान्याबाहेर ठेवाव्यात. तसेच पालिकेचा मालमत्ता करही नियमित भरावा,असे आवाहन महापौर दळवी यांनी केले.शहरातील बहुसंख्य डार्इंग व सायझिंग मालकांनी महानगरपालिकेचा मालमत्ता कर जवळपास नऊ वर्षे भरलेला नसल्याने महापालिकेचे मोठयÞा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या कामांना निधी कमी पडतो. यासाठी सरकारी नियमानुसार पालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व कापड कारखाने, सायझिंग व डार्इंग कारखान्यांचे सर्वेक्षण पालिकेने केले आहे. त्यानुसार सुमारे २७ कोटी ५० लाखांची थकबाकी असल्याची माहिती आयुक्त म्हसे यांनी बैठकीत दिली. त्यासाठी आयुक्तांनी त्यांना आठवडाभराची मुदत दिली आहे. त्या काळात कर न भरल्यास मालमत्ता सील करण्याचा इशाराही त्यांनी दिला.जागेवर जाऊन मोजणी-प्रत्येक कारखान्याचे क्षेत्र किती, त्यांनी किती जादा किंवा अनधिकृत बांधकाम केले आहे, याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिकेचे अधिकारी मोजमाप करणार आहेत. ते झाल्यानंतर सरकारी दरानुसार त्यांना कर लावला जाईल. तसेच त्यांच्याकडून दंडासह थकबाकी बसूल केली जाणार आहे. त्यामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. आठवडाभराची मुदत संपताच पालिका मोजणीचे आणि सील ठोकण्याचे काम सुरू करणार आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी