शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत समृद्धी गाजणार, शेतक-यांतील असंतोष कायम, भरपाईच्या मुद्द्यावरून प्रचार तापण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:30 IST

समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यासाठी आग्रह धरला जातो आहे. भरपाईचा मुद्दाही सुटलेला नाही. जमिनीला घसघशीत भरपाई देण्याचा प्रश्न १३ डिसेंबरपूर्वी सुटला नाही.

कल्याण : समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यासाठी आग्रह धरला जातो आहे. भरपाईचा मुद्दाही सुटलेला नाही. जमिनीला घसघशीत भरपाई देण्याचा प्रश्न १३ डिसेंबरपूर्वी सुटला नाही. तसे लेखी आश्वासन दिले नाही, तर कल्याण, भिवंडी, शहापूरमधील शेतकरी मतपेटीतून आपल्या भावना व्यक्त करतील, असा इशारा संघर्ष समितीच्या नेत्यांनी दिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही समृद्धी महामार्गाचा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. या महामार्गासोबतच आणखी वेगवेगळे प्रकल्प येत असल्याने शेतकºयांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.राज्य सरकारच्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील फळेगाव, उशीद, दानबाव, नडगाव, पिंताबरेपाडा, निंबवली, गुरवली, चिंचवली, राया, वासुंद्री ही दहा गावे बाधित होत आहे, असे सांगून समृद्धी शेती बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर म्हणाले, या दहा गावातील ११९४.०४ हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. जवळपास ७०० शेतकºयांच्या या जमिनी आहेत. त्यांचे सहखातेदार धरले तर हा आकडा तीन हजारांच्या घरात जातो. समृद्धी मार्गाला या शेतकºयांचा विरोध आहे. त्यांच्या मोबदल्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. त्यांचे खरेदी खत केलेले नाही. जागेच्या मोजणीसाठी अधिकारी आले होते, पण योग्य मोबदला मिळणार नसल्याने त्याला संघर्ष समितीने विरोध केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शेतकºयांना समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन करता येत नाही. असा विरोध केल्याने ११३ शेतकºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फळेगाव, उतणे, दानबाव येथे एक गुंठा जागेला सरकार ६१ हजारांचा मोबदला देत आहे. पण शहरीकरण झाल्याने सध्या जागेचा भाव एका गुंठ्याला तीन लाख रुपये आहे. कुठे ६१ हजार रुपये गुंठा आणि कुठे तीन लाख रुपये? शेतकरी त्याचे एवढे नुकसान करुन समृद्धीसाठी कशी जमीन देईल? याचा सारासार विचार सरकारने करावा, असा प्रश्न भोईर केला.कल्याण तालुक्यात जो ४० टक्के ग्रामीण भाग उरला आहे, त्यातून रिलायन्स कंपनीच्या गॅस प्रकल्पाच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मुंबई-बडोदा मार्गात गावे बाधित होणार आहेत. टिटवाळा-मुरबाड रेल्वेसाठी जमिनी जाणार आहेत. कल्याण-माळशेज रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. यापूर्वी कल्याण-कसारा या रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी जागा गेलेली आहे. वायरलेस टॉवरसाठी जागा बाधीत झालेली आहे. शिवाय आता विवार-अलिबाग कॉरिड़र होणार आहे. असे अनेक प्रकल्प कल्याणच्या ग्रामीण भागात होणार आहेत. त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही. जमिनीच्या दरात सरकार भेदभाव करते आहे. तो न करता सर्वांना समान दर मिळावा, अशी संघर्ष समितीची मागणी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.शेतकरी विविध पक्षांत विखुरलेलेसरकार शबरी योजनेअंतर्गत शेतकºयांना लाभ देण्याचा विचार करत आहे. समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया संघर्ष समितीने उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना विषय समजावून सांगितला आहे. राज ठाकरे यांनी तर महाराष्ट्र तोडणारा समृद्धी मार्ग असेल तर तो पूर्ण होण्याआधीच तोडला जाईल, असा इशारा सरकारला दिला आहे. महामार्गाला विरोध करणारे शेतकरी आजवरच्या विचारसरणीमुळे वेगवेगळ््या पक्षात विखुरलेले आहेत.त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण त्यांच्या संघर्ष समितीने भरपाईच्या बाजारभावाची, सर्वांना समान रक्कम देण्याची मागणी करत निवडणुकीच्या काळातही आंदोलनाची धग कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्यथा तीन तालुक्यांत त्याबद्दलची भावना मतपेटीतून व्यक्त होईल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण