शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची प्रगती हेच ‘सरस्वती’चे ध्येय, पालकांशी संवाद ठरतोय मोलाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:44 IST

पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो.

कल्याण - पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो. शाळा-पालकांमधील नेहमीच साधला जाणारा संवाद आणि विविध उपक्रमांमुळे या मराठी शाळेची पटसंख्या वाढत आहे.प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक साहेबराव कोळी यांनी सांगितले, आम्ही मागील वर्षी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, हे पाहिले. पालकांनी त्यासाठी उपायही सुचवले. त्यामुळे यंदा शाळेचा दहावीचा निकाल ९७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी या उपक्रमाचा चांगला फायदा झाला. यंदाच्या वर्षी हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर इयत्ता तिसरीसाठी राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत दररोज एक ते दोन पालक शाळेत येतात. पालकांचा केवळ १५ मिनिटे वेळ आम्ही घेतो. पुढील वर्षी पहिलीसाठी हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. शाळेने मागच्या वर्षी परिसरातील सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. जी मुले शाळेत जात नाहीत, त्यांची नोंदणी केली. या मुलांना शाळेत सामावून घेतल्याने पटसंख्येत वाढ झाली आहे.इंग्रजी माध्यमापेक्षा आपली शाळा कुठे ही कमी नाही, हे पालकांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. पाठ्यपुस्तके आणि जनरल नॉलेज, यावर आधारित क्षमता परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. गणित, भाषा, बुद्धिमत्ता या विषयांवर ही परीक्षा असते. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची जिद्द निर्माण होते. विद्यार्थ्यांची प्रगती हेच शाळेचे ध्येय आहे.आपली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी जगवण्यासाठी आपणच प्रयत्न करण्याची गरज आहे. आपणच मराठीला जगवले नाही, तर मुले मराठी विसरून जातील. इंग्रजी माध्यमात मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत. म्हणून मराठी माध्यमावर माझा अधिक विश्वास आहे.- रवी साबळे, पालक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा