शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

विद्यार्थ्यांची प्रगती हेच ‘सरस्वती’चे ध्येय, पालकांशी संवाद ठरतोय मोलाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:44 IST

पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो.

कल्याण - पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो. शाळा-पालकांमधील नेहमीच साधला जाणारा संवाद आणि विविध उपक्रमांमुळे या मराठी शाळेची पटसंख्या वाढत आहे.प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक साहेबराव कोळी यांनी सांगितले, आम्ही मागील वर्षी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, हे पाहिले. पालकांनी त्यासाठी उपायही सुचवले. त्यामुळे यंदा शाळेचा दहावीचा निकाल ९७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी या उपक्रमाचा चांगला फायदा झाला. यंदाच्या वर्षी हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर इयत्ता तिसरीसाठी राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत दररोज एक ते दोन पालक शाळेत येतात. पालकांचा केवळ १५ मिनिटे वेळ आम्ही घेतो. पुढील वर्षी पहिलीसाठी हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. शाळेने मागच्या वर्षी परिसरातील सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. जी मुले शाळेत जात नाहीत, त्यांची नोंदणी केली. या मुलांना शाळेत सामावून घेतल्याने पटसंख्येत वाढ झाली आहे.इंग्रजी माध्यमापेक्षा आपली शाळा कुठे ही कमी नाही, हे पालकांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. पाठ्यपुस्तके आणि जनरल नॉलेज, यावर आधारित क्षमता परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. गणित, भाषा, बुद्धिमत्ता या विषयांवर ही परीक्षा असते. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची जिद्द निर्माण होते. विद्यार्थ्यांची प्रगती हेच शाळेचे ध्येय आहे.आपली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी जगवण्यासाठी आपणच प्रयत्न करण्याची गरज आहे. आपणच मराठीला जगवले नाही, तर मुले मराठी विसरून जातील. इंग्रजी माध्यमात मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत. म्हणून मराठी माध्यमावर माझा अधिक विश्वास आहे.- रवी साबळे, पालक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा