शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विद्यार्थ्यांची प्रगती हेच ‘सरस्वती’चे ध्येय, पालकांशी संवाद ठरतोय मोलाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:44 IST

पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो.

कल्याण - पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो. शाळा-पालकांमधील नेहमीच साधला जाणारा संवाद आणि विविध उपक्रमांमुळे या मराठी शाळेची पटसंख्या वाढत आहे.प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक साहेबराव कोळी यांनी सांगितले, आम्ही मागील वर्षी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, हे पाहिले. पालकांनी त्यासाठी उपायही सुचवले. त्यामुळे यंदा शाळेचा दहावीचा निकाल ९७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी या उपक्रमाचा चांगला फायदा झाला. यंदाच्या वर्षी हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर इयत्ता तिसरीसाठी राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत दररोज एक ते दोन पालक शाळेत येतात. पालकांचा केवळ १५ मिनिटे वेळ आम्ही घेतो. पुढील वर्षी पहिलीसाठी हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. शाळेने मागच्या वर्षी परिसरातील सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. जी मुले शाळेत जात नाहीत, त्यांची नोंदणी केली. या मुलांना शाळेत सामावून घेतल्याने पटसंख्येत वाढ झाली आहे.इंग्रजी माध्यमापेक्षा आपली शाळा कुठे ही कमी नाही, हे पालकांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. पाठ्यपुस्तके आणि जनरल नॉलेज, यावर आधारित क्षमता परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. गणित, भाषा, बुद्धिमत्ता या विषयांवर ही परीक्षा असते. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची जिद्द निर्माण होते. विद्यार्थ्यांची प्रगती हेच शाळेचे ध्येय आहे.आपली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी जगवण्यासाठी आपणच प्रयत्न करण्याची गरज आहे. आपणच मराठीला जगवले नाही, तर मुले मराठी विसरून जातील. इंग्रजी माध्यमात मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत. म्हणून मराठी माध्यमावर माझा अधिक विश्वास आहे.- रवी साबळे, पालक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा