शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

युपीएच्या काळात भारत नवव्या स्थानी होता: प्रा. संगीत रागी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 10, 2023 15:19 IST

युपीए सरकारच्या काळात नवव्या स्थानी असलेला भारत आज जगात पाचव्या स्थानी असून या आठ वर्षात निर्यातीतही अव्वल बनला आहे.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : युपीए सरकारच्या काळात नवव्या स्थानी असलेला भारत आज जगात पाचव्या स्थानी असून या आठ वर्षात निर्यातीतही अव्वल बनला आहे. १९७१ च्या जनगणनेत ३ टक्के साक्षर होते आज ७४ टक्के साक्षर आहोत असे मत राजकीय विश्लेषक प्रा.संगीत रागी यांनी व्यक्त केले. 

ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे उद्धाटन प्रा.संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झाले. त्यावेळी "आझादी का अमृत महोत्सव" हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ.संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहीत व्यासपीठावर उपस्थित होते. 

प्रा.रागी यांनी, प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नकाशाचा उल्लेख करून विविध दाखले दिले. ही भूमी देवदुतांच्या अवतारांची नसून साक्षात देवांची भूमी आहे. पूर्वी भारताच्या सीमा कंधार, ब्रम्हदेशपर्यत जात होत्या. अशा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये, संस्थाने या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज असले तरी याच विविधतेत भारताची एकता सामावलेली आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असुन गुरु - शिष्याच्या परंपरेने भारत विशाल बनला आहे. वेद, उपनिषदे व शास्त्रांमुळे भारत जगात श्रेष्ठ आहे. तरीही स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याकडे प्रा. रागी यांनी लक्ष वेधले. 

महर्षी अरविंद, रविंद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भारताविषयीचे योगदान स्पष्ट करून त्यांनी १९४७ ते २०१४ पर्यंतच्या भारतीय कालखंडाची परखड शब्दात मिमांसा केली तर, हिंदुंना गहन चिंतनाची गरज असल्याचे सांगून २०१४ नंतरच खऱ्या अर्थाने नव्या विचारांचा भारत घडत असल्याचे नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे