शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

युपीएच्या काळात भारत नवव्या स्थानी होता: प्रा. संगीत रागी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 10, 2023 15:19 IST

युपीए सरकारच्या काळात नवव्या स्थानी असलेला भारत आज जगात पाचव्या स्थानी असून या आठ वर्षात निर्यातीतही अव्वल बनला आहे.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : युपीए सरकारच्या काळात नवव्या स्थानी असलेला भारत आज जगात पाचव्या स्थानी असून या आठ वर्षात निर्यातीतही अव्वल बनला आहे. १९७१ च्या जनगणनेत ३ टक्के साक्षर होते आज ७४ टक्के साक्षर आहोत असे मत राजकीय विश्लेषक प्रा.संगीत रागी यांनी व्यक्त केले. 

ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे उद्धाटन प्रा.संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झाले. त्यावेळी "आझादी का अमृत महोत्सव" हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ.संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहीत व्यासपीठावर उपस्थित होते. 

प्रा.रागी यांनी, प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नकाशाचा उल्लेख करून विविध दाखले दिले. ही भूमी देवदुतांच्या अवतारांची नसून साक्षात देवांची भूमी आहे. पूर्वी भारताच्या सीमा कंधार, ब्रम्हदेशपर्यत जात होत्या. अशा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये, संस्थाने या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज असले तरी याच विविधतेत भारताची एकता सामावलेली आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असुन गुरु - शिष्याच्या परंपरेने भारत विशाल बनला आहे. वेद, उपनिषदे व शास्त्रांमुळे भारत जगात श्रेष्ठ आहे. तरीही स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याकडे प्रा. रागी यांनी लक्ष वेधले. 

महर्षी अरविंद, रविंद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भारताविषयीचे योगदान स्पष्ट करून त्यांनी १९४७ ते २०१४ पर्यंतच्या भारतीय कालखंडाची परखड शब्दात मिमांसा केली तर, हिंदुंना गहन चिंतनाची गरज असल्याचे सांगून २०१४ नंतरच खऱ्या अर्थाने नव्या विचारांचा भारत घडत असल्याचे नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे