शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न निकाली?, शहरात आनंदी आनंद अन् भाजपा-सेनेत श्रेयासाठी चढाओढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:12 IST

शहरातील अवैध बांधकामे व धोकादायक इमारती नियमित करण्याचा मुद्यावरून शिवसेना व भाजप नेते श्रयासाठी आमनेसामने आले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे व धोकादायक इमारती नियमित करण्याचा मुद्यावरून शिवसेना व भाजप नेते श्रयासाठी आमनेसामने आले. दरम्यान आज सोमवारी आमदार बालाजी किणीकर यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारल्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आठवड्यात गुड न्युज मिळणार असल्याच्या वक्तव्याने, शहरातील धोकादायक व अवैध बांधकामाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगरातील धोकादायक इमारती व अवैध बांधकामाचा प्रश्न अनेक वर्षांपासून लटकलेला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अवैध बांधकामे नियमित करणे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी कऱण्याचा प्रश्न उचलून ऐरणीवर आणला. तर आमदार बाळाजी किणीकर यांनी अवैध बांधकामे नियमित करणे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करणे बाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्न सोमवारी विचारला. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आठवड्यात गुड न्यूज देणार असल्याचें पालकमंत्री शिंदे म्हणाले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनाने धोकादायक इमारती व अवैध बांधकामाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

गेल्या वर्षी तीन इमारतीचा स्लॅब कोसळून १३ जणांचा बळी गेला असून त्यावेळी मृत्यूमुखी झालेल्यांच्या नातेवाईकाला प्रत्येकी ५ लाखाची मदत देण्याचे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी दिले होते. मात्र अद्यापही मदत मिळाली नाही. मात्र त्यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित करण्याचे संकेत पालकमंत्री शिंदे यांनी दिले. पालकमंत्री शिंदे यांच्या आश्वासनाने शहरात आनंद व्यक्त होत आहे. धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी व अवैध बांधकाम नियमित होणार असल्याची चर्चाही सुरू झाली असून स्थानिक शिवसेना व भाजप नेत्यात श्रेयासाठी चढाओढ निर्माण झाली.

डी फार्म धूळखात पडून

 शासनाच्या अध्यादेशनुसार अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, ८७ जणांना डी फार्म साठी देणे आवश्यक आहे. त्यातील काही जणांना डी फार्म दिला. मात्र आजमितीस २५ पेक्षा जास्त डी फार्म धूळखात पडून असून डी फार्म संबंधितांना द्यावे. अशी मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे