शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

कळवा, मुंब्य्रात विजेचे तीन महिन्यांत खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:08 IST

विश्वास पाठक यांची माहिती : तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलले

ठाणे : भिवंडीच्या धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील वाढती वीजगळती, थकबाकी आणि चोरीच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यांत या भागाचेही खाजगीकरण केले जाणार असल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ठाणे येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राज्यातील मालेगावातही विजेचे खाजगीकरण केले जाणार आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलण्यात आले असून मीटरचा असलेला तुटवडासुद्धा आता दूर झाला असल्याचा दावा त्यांनी केला.

महावितरणने मागील चार वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भिवंडीत विजेचे खाजगीकरण केल्याने वीजगळती ५० टक्कयांवरून १८ टक्कयांवर आली आहे. त्याच धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने खाजगीकरणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून येत्या तीन महिन्यांत कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांचे खाजगीकरण केले जाणार आहे. त्यामुळे येथील दीड लाख ग्राहकांना याची झळ मात्र बसणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु, यामुळे वीजचोरीला आळा बसणार असून गळतीचे प्रमाणही कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात १६ लाख मीटर हे सदोष होते. तर, ठाणे जिल्ह्यात याचा आकडा हा तीन लाख ८७ हजार एवढा होता. परंतु, आता ते मीटर बदलण्यात आले असून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रोलेक्स आणि फ्लॅश या दोन कंपन्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.

शिवाय, त्यांना काळ्या यादीत टाकल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी मीटरतुटवडा जाणवत होता. परंतु, आता २० लाख नवीन मीटर मागवले आहेत. ठाणे जिल्ह्यात ४१ हजार मीटरची गरज असून त्यातील २८ हजार ५०० मीटर आले आहेत. उर्वरित मीटरही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात भारनियमन नसल्याचा दावा त्यांनी कायम ठेवला असून कळवा, मुंब्य्रातील भारनियमनाबाबत त्यांना छेडले असता, ज्या पद्धतीने आठवड्यातून एकदा रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जातो, त्याच पद्धतीने या भागात देखभाल, दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे याला भारनियमन म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सोलर विजेचा प्रयोग यशस्वीराज्यातील गडचिरोली आणि नंदुरबार भागांतील काही गावपाड्यांमध्ये आज वीज पोहोचलेली नाही. परंतु, या भागातही डिसेंबरअखेर वीज दिली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. शेतकºयांसाठी सोलर विजेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून आता तो संपूर्ण राज्यात राबवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रयोगामुळे शेतकºयांना वीज स्वस्त मिळणार असून त्यामुळे महावितरणचा आणि एकूणच इतर ग्राहकांवरील बोजाही कमी होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात २९६ कोटींची थकबाकीराज्यात शेतकºयांकडे २५ हजार कोटींची थकबाकी असून आता दुष्काळ पडल्याने वसुली थांबवली आहे. तर, राज्यातील इतर ग्राहकांकडे पाच हजार कोटींची थकबाकी आहे. तसेच ठाणे जिल्ह्याची थकबाकी ही २९६ कोटींची असून त्यामध्ये मुंब्य्राची ७३ कोटी, तर कळव्याची २० कोटी थकबाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.आॅनलाइनलासात महिन्यांत८५० तक्रारीमहावितरणने आता ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आॅनलाइन प्रणालीचा आधार घेतला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत ८५० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणthaneठाणे