शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

कळवा, मुंब्य्रात विजेचे तीन महिन्यांत खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:08 IST

विश्वास पाठक यांची माहिती : तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलले

ठाणे : भिवंडीच्या धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील वाढती वीजगळती, थकबाकी आणि चोरीच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यांत या भागाचेही खाजगीकरण केले जाणार असल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ठाणे येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राज्यातील मालेगावातही विजेचे खाजगीकरण केले जाणार आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलण्यात आले असून मीटरचा असलेला तुटवडासुद्धा आता दूर झाला असल्याचा दावा त्यांनी केला.

महावितरणने मागील चार वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भिवंडीत विजेचे खाजगीकरण केल्याने वीजगळती ५० टक्कयांवरून १८ टक्कयांवर आली आहे. त्याच धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने खाजगीकरणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून येत्या तीन महिन्यांत कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांचे खाजगीकरण केले जाणार आहे. त्यामुळे येथील दीड लाख ग्राहकांना याची झळ मात्र बसणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु, यामुळे वीजचोरीला आळा बसणार असून गळतीचे प्रमाणही कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात १६ लाख मीटर हे सदोष होते. तर, ठाणे जिल्ह्यात याचा आकडा हा तीन लाख ८७ हजार एवढा होता. परंतु, आता ते मीटर बदलण्यात आले असून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रोलेक्स आणि फ्लॅश या दोन कंपन्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.

शिवाय, त्यांना काळ्या यादीत टाकल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी मीटरतुटवडा जाणवत होता. परंतु, आता २० लाख नवीन मीटर मागवले आहेत. ठाणे जिल्ह्यात ४१ हजार मीटरची गरज असून त्यातील २८ हजार ५०० मीटर आले आहेत. उर्वरित मीटरही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात भारनियमन नसल्याचा दावा त्यांनी कायम ठेवला असून कळवा, मुंब्य्रातील भारनियमनाबाबत त्यांना छेडले असता, ज्या पद्धतीने आठवड्यातून एकदा रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जातो, त्याच पद्धतीने या भागात देखभाल, दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे याला भारनियमन म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सोलर विजेचा प्रयोग यशस्वीराज्यातील गडचिरोली आणि नंदुरबार भागांतील काही गावपाड्यांमध्ये आज वीज पोहोचलेली नाही. परंतु, या भागातही डिसेंबरअखेर वीज दिली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. शेतकºयांसाठी सोलर विजेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून आता तो संपूर्ण राज्यात राबवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रयोगामुळे शेतकºयांना वीज स्वस्त मिळणार असून त्यामुळे महावितरणचा आणि एकूणच इतर ग्राहकांवरील बोजाही कमी होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात २९६ कोटींची थकबाकीराज्यात शेतकºयांकडे २५ हजार कोटींची थकबाकी असून आता दुष्काळ पडल्याने वसुली थांबवली आहे. तर, राज्यातील इतर ग्राहकांकडे पाच हजार कोटींची थकबाकी आहे. तसेच ठाणे जिल्ह्याची थकबाकी ही २९६ कोटींची असून त्यामध्ये मुंब्य्राची ७३ कोटी, तर कळव्याची २० कोटी थकबाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.आॅनलाइनलासात महिन्यांत८५० तक्रारीमहावितरणने आता ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आॅनलाइन प्रणालीचा आधार घेतला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत ८५० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणthaneठाणे