शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कळवा, मुंब्य्रात विजेचे तीन महिन्यांत खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:08 IST

विश्वास पाठक यांची माहिती : तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलले

ठाणे : भिवंडीच्या धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील वाढती वीजगळती, थकबाकी आणि चोरीच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यांत या भागाचेही खाजगीकरण केले जाणार असल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ठाणे येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राज्यातील मालेगावातही विजेचे खाजगीकरण केले जाणार आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलण्यात आले असून मीटरचा असलेला तुटवडासुद्धा आता दूर झाला असल्याचा दावा त्यांनी केला.

महावितरणने मागील चार वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भिवंडीत विजेचे खाजगीकरण केल्याने वीजगळती ५० टक्कयांवरून १८ टक्कयांवर आली आहे. त्याच धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने खाजगीकरणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून येत्या तीन महिन्यांत कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांचे खाजगीकरण केले जाणार आहे. त्यामुळे येथील दीड लाख ग्राहकांना याची झळ मात्र बसणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु, यामुळे वीजचोरीला आळा बसणार असून गळतीचे प्रमाणही कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात १६ लाख मीटर हे सदोष होते. तर, ठाणे जिल्ह्यात याचा आकडा हा तीन लाख ८७ हजार एवढा होता. परंतु, आता ते मीटर बदलण्यात आले असून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रोलेक्स आणि फ्लॅश या दोन कंपन्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.

शिवाय, त्यांना काळ्या यादीत टाकल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी मीटरतुटवडा जाणवत होता. परंतु, आता २० लाख नवीन मीटर मागवले आहेत. ठाणे जिल्ह्यात ४१ हजार मीटरची गरज असून त्यातील २८ हजार ५०० मीटर आले आहेत. उर्वरित मीटरही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात भारनियमन नसल्याचा दावा त्यांनी कायम ठेवला असून कळवा, मुंब्य्रातील भारनियमनाबाबत त्यांना छेडले असता, ज्या पद्धतीने आठवड्यातून एकदा रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जातो, त्याच पद्धतीने या भागात देखभाल, दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे याला भारनियमन म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सोलर विजेचा प्रयोग यशस्वीराज्यातील गडचिरोली आणि नंदुरबार भागांतील काही गावपाड्यांमध्ये आज वीज पोहोचलेली नाही. परंतु, या भागातही डिसेंबरअखेर वीज दिली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. शेतकºयांसाठी सोलर विजेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून आता तो संपूर्ण राज्यात राबवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रयोगामुळे शेतकºयांना वीज स्वस्त मिळणार असून त्यामुळे महावितरणचा आणि एकूणच इतर ग्राहकांवरील बोजाही कमी होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात २९६ कोटींची थकबाकीराज्यात शेतकºयांकडे २५ हजार कोटींची थकबाकी असून आता दुष्काळ पडल्याने वसुली थांबवली आहे. तर, राज्यातील इतर ग्राहकांकडे पाच हजार कोटींची थकबाकी आहे. तसेच ठाणे जिल्ह्याची थकबाकी ही २९६ कोटींची असून त्यामध्ये मुंब्य्राची ७३ कोटी, तर कळव्याची २० कोटी थकबाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.आॅनलाइनलासात महिन्यांत८५० तक्रारीमहावितरणने आता ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आॅनलाइन प्रणालीचा आधार घेतला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत ८५० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणthaneठाणे