शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांचे खासगी ‘पीए’ सांभाळतात कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:53 IST

तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात.

- जनार्दन भेरेभातसानगर - तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात. तलाठ्यांना केवळ सही करावी लागते. तालुक्यात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त असून त्यांचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे मंडळ अधिकारीही तलाठी सजाच्या कामासाठी या खासगी कर्मचाऱ्यांवरच विसंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहापूर तालुका हा जसा धरणांचा तालुका तसाच तो वेगवेगळ्या पिकांचाही तालुका. त्यामुळेच या तालुक्यात तलाठ्यांचे महत्त्व थोडे जास्तच आहे. प्रत्यक्षात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तलाठी नसल्याने सात तलाठी सजांचा कारभार मंडळ अधिकाºयांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्य:स्थितीत शेतकºयांच्या दृष्टीने तलाठ्यांची नितांत गरज आहे. तालुक्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता नवीन सजा पुनर्रचना २०१८ नुसार तालुक्यात ५९ तलाठ्यांची गरज असून या रिक्त पदांसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद झाल्यानंतर पदनिर्मिती होऊन नियमानुसार पदे भरली जातील, अशी माहिती तहसीलदार रवींद बाविस्कर यांनी दिली.महसुली गावे आणि क्षेत्रफळाचा विचार करता तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कामाचा ताण येणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यामुळे काही समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तलाठ्यांच्या पदनिर्मितीसाठी क्षेत्रफळ, गावांची संख्या, महसुली गावे, सातबारा यांची संख्या आदी बाबी विचारात घेतल्या जातात. मात्र, सद्य:स्थितीत तालुक्यासाठी मंजूर असलेल्या ३८ पदांपैकी केवळ ३१ तलाठी काम सांभाळत आहेत. सात तलाठ्यांचा प्रभार मंडळ अधिकारी सांभाळत आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंडळ अधिकारी उपलब्ध नसल्यास तलाठी क्षेत्राचा कारभार तलाठ्यांनी नेमलेले खासगी कर्मचारी सांभाळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तलाठी नसल्याने या खासगी कर्मचाºयांची मनमानी सुरू असून त्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.तालुक्यात मुगाव, साकुर्ली, अघई, दहीगाव, डोळखांब, बिरवाडी, साकडबाव या तलाठी सजांना तलाठी नाहीत. त्यामुळे शेतकºयांना सातबारा, फेरफार आठ अ, वारस तक्ते, शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाची कागदपत्रे मिळवताना अडचणी येत आहेत.तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना थेट तहसील कार्यालय गाठावे लागत असून त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाने शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी, त्यांचा वेळ व पैशांची बचत व्हावी, यासाठी त्यात्या क्षेत्रानुसार तलाठी सजा निर्माण करून सोयी केल्या आहेत.मात्र, सद्य:स्थितीत तालुक्यातील सात तलाठी सजांचे कामकाज नियमितपणे पाहण्यासाठी तलाठीच नसल्याने मंडळ अधिकाºयांना आधीची कामे सांभाळून तलाठ्यांचेही कामकाज पाहावे लागत आहे.त्यामुळे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे या मंडळ अधिकाºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांच्या सोयीसाठी तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जोर धरत आहे. ही पदे भरली जात नसल्याने शेतकºयांना कामासाठी खेटे मारावे लागतात. यात त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होत असल्याने प्रशासनाने ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. संबंधित यंत्रणा याकडे तातडीने लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :newsबातम्या