शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तलाठ्यांचे खासगी ‘पीए’ सांभाळतात कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:53 IST

तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात.

- जनार्दन भेरेभातसानगर - तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात. तलाठ्यांना केवळ सही करावी लागते. तालुक्यात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त असून त्यांचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे मंडळ अधिकारीही तलाठी सजाच्या कामासाठी या खासगी कर्मचाऱ्यांवरच विसंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहापूर तालुका हा जसा धरणांचा तालुका तसाच तो वेगवेगळ्या पिकांचाही तालुका. त्यामुळेच या तालुक्यात तलाठ्यांचे महत्त्व थोडे जास्तच आहे. प्रत्यक्षात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तलाठी नसल्याने सात तलाठी सजांचा कारभार मंडळ अधिकाºयांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्य:स्थितीत शेतकºयांच्या दृष्टीने तलाठ्यांची नितांत गरज आहे. तालुक्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता नवीन सजा पुनर्रचना २०१८ नुसार तालुक्यात ५९ तलाठ्यांची गरज असून या रिक्त पदांसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद झाल्यानंतर पदनिर्मिती होऊन नियमानुसार पदे भरली जातील, अशी माहिती तहसीलदार रवींद बाविस्कर यांनी दिली.महसुली गावे आणि क्षेत्रफळाचा विचार करता तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कामाचा ताण येणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यामुळे काही समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तलाठ्यांच्या पदनिर्मितीसाठी क्षेत्रफळ, गावांची संख्या, महसुली गावे, सातबारा यांची संख्या आदी बाबी विचारात घेतल्या जातात. मात्र, सद्य:स्थितीत तालुक्यासाठी मंजूर असलेल्या ३८ पदांपैकी केवळ ३१ तलाठी काम सांभाळत आहेत. सात तलाठ्यांचा प्रभार मंडळ अधिकारी सांभाळत आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंडळ अधिकारी उपलब्ध नसल्यास तलाठी क्षेत्राचा कारभार तलाठ्यांनी नेमलेले खासगी कर्मचारी सांभाळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तलाठी नसल्याने या खासगी कर्मचाºयांची मनमानी सुरू असून त्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.तालुक्यात मुगाव, साकुर्ली, अघई, दहीगाव, डोळखांब, बिरवाडी, साकडबाव या तलाठी सजांना तलाठी नाहीत. त्यामुळे शेतकºयांना सातबारा, फेरफार आठ अ, वारस तक्ते, शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाची कागदपत्रे मिळवताना अडचणी येत आहेत.तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना थेट तहसील कार्यालय गाठावे लागत असून त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाने शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी, त्यांचा वेळ व पैशांची बचत व्हावी, यासाठी त्यात्या क्षेत्रानुसार तलाठी सजा निर्माण करून सोयी केल्या आहेत.मात्र, सद्य:स्थितीत तालुक्यातील सात तलाठी सजांचे कामकाज नियमितपणे पाहण्यासाठी तलाठीच नसल्याने मंडळ अधिकाºयांना आधीची कामे सांभाळून तलाठ्यांचेही कामकाज पाहावे लागत आहे.त्यामुळे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे या मंडळ अधिकाºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांच्या सोयीसाठी तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जोर धरत आहे. ही पदे भरली जात नसल्याने शेतकºयांना कामासाठी खेटे मारावे लागतात. यात त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होत असल्याने प्रशासनाने ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. संबंधित यंत्रणा याकडे तातडीने लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :newsबातम्या