शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय तर पवार-ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोब जाणार: प्रकाश आंबेडकर

By नितीन पंडित | Updated: May 18, 2024 21:20 IST

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.

भिवंडी: मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभा म्हणजे तमाशा असून एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तेथे दुसरे काही झालेच नाही.पुढच्या पाच वर्षात काय करणारा हे कोणीही सांगितले नाही.पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले आहे.त्यामुळे या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडला,नागरिकत्व सुद्धा सोडले. ज्यांची मालमत्ता ५० कोटी पेक्षा अधिक आहे. जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.

"शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकी नंतर भाजपा सोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही," असे वक्तव्य देखील आंबेडकर यांनी यावेळी केले.

महायुतीच्या महाराष्ट्रात पाच ते सहा जागा ज्या सुरक्षित आहेत त्या सोडल्या तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे.त्यामुळे जे चारशेचा क्लेम करीत होते,४८ जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्या पासून स्वतःला रोखत आहेत.ही लाट भाजपा विरोधात आहे.टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपाला बसणार आहे.त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील असेही आंबेडकर म्हणाले असून जे पी नड्डा यांच्या आर एस एस संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता,नड्डा यांचे विधान फसवे विधान आहे.त्यासाठी आमचा आर एस एस बरोबर संबंध नाही असे भसवण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 प्रकाश आंबेडकर यांना वाहतूक कोंडीचा फटका दुचाकी वरून प्रवास 

भिवंडीत प्रचार सभे साठी येताना ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला आहे. कशेळी ते अंजुर फाटा दरम्यान अखेर त्यांनी आपल्या कारमधून उतरून दुचाकी वरून प्रवास करीत भिवंडी येथील सभास्थळ प्रचाराची वेळ संपण्यासाठी अवघे दहा मिनिट शिल्लक असताना गाठले. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी