शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय तर पवार-ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोब जाणार: प्रकाश आंबेडकर

By नितीन पंडित | Updated: May 18, 2024 21:20 IST

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.

भिवंडी: मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभा म्हणजे तमाशा असून एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तेथे दुसरे काही झालेच नाही.पुढच्या पाच वर्षात काय करणारा हे कोणीही सांगितले नाही.पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले आहे.त्यामुळे या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडला,नागरिकत्व सुद्धा सोडले. ज्यांची मालमत्ता ५० कोटी पेक्षा अधिक आहे. जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.

"शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकी नंतर भाजपा सोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही," असे वक्तव्य देखील आंबेडकर यांनी यावेळी केले.

महायुतीच्या महाराष्ट्रात पाच ते सहा जागा ज्या सुरक्षित आहेत त्या सोडल्या तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे.त्यामुळे जे चारशेचा क्लेम करीत होते,४८ जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्या पासून स्वतःला रोखत आहेत.ही लाट भाजपा विरोधात आहे.टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपाला बसणार आहे.त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील असेही आंबेडकर म्हणाले असून जे पी नड्डा यांच्या आर एस एस संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता,नड्डा यांचे विधान फसवे विधान आहे.त्यासाठी आमचा आर एस एस बरोबर संबंध नाही असे भसवण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 प्रकाश आंबेडकर यांना वाहतूक कोंडीचा फटका दुचाकी वरून प्रवास 

भिवंडीत प्रचार सभे साठी येताना ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला आहे. कशेळी ते अंजुर फाटा दरम्यान अखेर त्यांनी आपल्या कारमधून उतरून दुचाकी वरून प्रवास करीत भिवंडी येथील सभास्थळ प्रचाराची वेळ संपण्यासाठी अवघे दहा मिनिट शिल्लक असताना गाठले. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी