शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणाअभावी रखडली ‘पंतप्रधान आवास’

By admin | Updated: February 26, 2017 02:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन ‘क्लस्टर योजना’ आणि ‘पंतप्रधान आवास योजने’

- मुरलीधर भवार,  कल्याण

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन ‘क्लस्टर योजना’ आणि ‘पंतप्रधान आवास योजने’ अंतर्गत करण्यात येणार आहे. मात्र, पंतप्रधान आवास योजना राबवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी महापालिकेस कंत्राटदारच मिळत नसल्याने ते रखडले आहे. धोकादायक इमारतींमधील काहींना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करता आलेले नाही. त्यामुळे या योजनेसाठी तातडीने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करून सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केली आहे. या प्रश्नी भाकपाचे अरुण वेळासकर, महेश साळूंके आणि सुनील नायक यांनी नुकतीच महापौर राजेंद्र देवळेकर व सभागृह नेते राजेश मोरे यांची भेट घेतली. सर्वेक्षण करण्याचा विषयी तातडीने एक ठराव महासभेत मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. धोकादायक इमारतींच्या प्रश्नी महापालिका प्रश्नासनाकडून दिरंगाई व चालढकल करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरीकडे सर्वेक्षणासाठी दत्तनगरातील रहिवाशांनी मोरे यांच्या कार्यालयावर अलीकडेच धडक दिली होती. पावसाळ््यात महापालिका धोकादायक इमारतींच्या प्रश्नी जागी होते. त्यानंतर पुन्हा तो बासनात बांधून ठेवला जातो. पावसाळ््यापूर्वी त्यासाठी प्रयत्न होत नाहीत. आता पावसाळा तीन महिन्यांवर आहे. त्याआधीच हालचाली आवश्यक आहेत, असे भाकपने म्हटले आहे. एखादी धोकादायक इमारत कोसळल्यावर विकासक वर्षभरात भोडकरूंना ती विकसित करून देत नसल्यास ती विकसित करण्याचा अधिकार भाडेकरूंना मिळावा, हा धोरणात्मक निर्णयही महापालिकेने घेऊन तो सरकार दरबारी पाठवला पाहिजे, अशी आग्रही मागणी भाकपने केली आहे.बीएसयूपी योजनेत सहभागी करून घेण्याची मागणी डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर न्यायालयाने राजीव गांधी आवास योजने अंतर्गत सर्वेक्षण करावे, असे म्हटले होते. २०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार आले. या सरकारने राजीव गांधी आवास योजना रद्द होऊन पंतप्रधान आवास योजना लागू केली. या योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत देश झोपडीमुक्त करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळ््यासमोर ठेवले आहे. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्ली येथील ‘मातृछाया’ ही धोकादायक इमारत कोसळून त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सरकारने तातडीने योजना जाहीर करावी, या मागणीसाठी सुनील नायक यांनी उच्च न्यायालयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीच होत नसल्याने त्यांनी याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. दीड महिन्यापूर्वी न्यायालयाने याचिकेचे कागदपत्र गहाळ झाल्याचे सांगितले, असे नायक म्हणाले. कागदपत्रे गाहळ झाल्याने ती पुन्हा नव्याने सादर केली. येत्या महिन्यात त्याच्या सुनावणीची तारीख मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘क्लस्टर’चा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोटही रखडलापंतप्रधान आवास योजनेसाठीच्या सर्वेक्षणासाठी कंत्राटदार मिळत नसला तरी महापालिकेने धोकादायक इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर योजना राबवण्याचे ठरवले आहे. योजना राबवण्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेने आॅगस्ट २०१६ मध्ये केला आहे. हा अहवाल दोन महिन्यांत तयार केला जाईल. तो सरकार दरबारी पाठवला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, सहा महिने उलटूनही तो अद्याप तयार झालेला नाही. महापौर राजेंद्र देवळेकर यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, हा अहवाल जवळपास तयार होत आला आहे. तो मार्चच्या महासभेसमोर ठेवला जाईल.