शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

डाळींचे भाव उतरले, तर कडधान्ये महागल्याने ग्राहकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:27 IST

शेवग्याच्या शेंगा अद्याप महाग; सीताफळही कडाडले

ठाणे : काही दिवसांपासून महागलेल्या डाळी या आठवड्यात स्वस्त झाल्या आहेत. दुसरीकडे कडधान्य मात्र महागले आहे. भाज्या स्वस्त असल्या, तरी शेवग्याच्या शेंगा अद्याप महाग आहेत. मुळा ही आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. फळांमध्ये सीताफळ महाग झाले असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.गेल्या आठवड्यात सुक्या खोबऱ्यानंतर आता कडधान्य महागले आहे. तूरडाळ, मूगडाळही महाग होती. आता या डाळी स्वस्त झाल्या असून, दहा रुपयांनी दर उतरले असल्याचे किराणा विक्रेते कुणाल सराफ यांनी सांगितले. कडधान्यापेक्षा डाळींची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. त्यामुळे डाळी स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सफरचंद स्वस्त झाले आहेत. आता सीताफळ महाग झाले आहे. हिरव्या द्राक्षांचा सीझन सुरू झाला नसला, तरी काळी द्राक्षे बाजारात आली आहेत. मात्र, ती महाग असल्याचे फळविक्रेते दीपेश मोरे यांनी सांगितले. पेरू आणि संत्रीही सध्या स्वस्त तर माल्टा महाग आहे. भेंडी आता स्वस्त झाली आहे.  पालेभाज्या प्रचंड स्वस्त असल्याचे भाजी विक्रेते मोरे म्हणाले.तूरडाळ ११० रुपये किलाे तूरडाळ आधी १३५ रुपये किलोने तर मूगडाळ १३० रुपये किलोने मिळत होती. या आठवड्यात तूरडाळ होलसेलमध्ये ११० रुपयांनी तर किरकोळमध्ये १२५ रुपये किलो, मूगडाळ होलसेलमध्ये ११५ तर किरकोळमध्ये १२० रुपये किलोने मिळत आहे.  काळी द्राक्षे २०० रु. किलाेसफरचंद होलसेलमध्ये १४० ते १६० तर किरकोळमध्ये १६० ते १८० रुपये किलोने मिळत आहेत. आधी २०० ते २२० रुपये किलोने मिळत होते. काळी द्राक्षे होलसेलमध्ये १६० रुपये किलो तर किरकोळमध्ये २०० रुपये किलोने मिळत आहे.  भेंडी ५० रु.कि.भेंडी होलसेलमध्ये ३० ते ४० तर किरकोळमध्ये ४० ते ५० रुपये किलो, टोमॅटो होलसेलमध्ये ३० ते ४० तर किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. होलसेलमध्ये मुळा एका जुडीत १५ ते २० असून ती २० रुपयांनी मिळते. किरकोळमध्ये २० रुपयांत एका जुडीत तीन नग मिळतात.लॉकडाऊनमध्ये गगनाला भिडलेले भाजीचे भाव आता कमी झालेले दिसून येत आहेत. थंडीची चाहूल लागल्यावर बाजारात सर्वप्रकारच्या भाज्या मुबलक मिळू लागल्या आहेत. तसेच, ताज्या भाज्या या थंडीमध्ये अधिक चविष्ट लागत आहेत. - मेघा साेपारकर, ग्राहकसंत्री स्वस्त झाली असली, तरी माल्टा अद्याप महाग आहे. माल्टा कधी उपलब्ध होतो, तर कधी नाही, अशी परिस्थिती आहे.- दीपेश माेरे, फळविक्रेताडाळींची आवक वाढल्याने डाळींचे भाव कमी झाले आहेत. कडधान्याचा मोजकाच माल भरला जात आहे.- कुणाल सराफ, किराणा दुकानदार