शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

छळप्रकरणी कारवाईस टाळाटाळ

By admin | Updated: February 15, 2017 04:36 IST

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत मालाड पोलीस ठाण्यात चार वर्षांपासून तक्रारी करूनही

मुंबई : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत मालाड पोलीस ठाण्यात चार वर्षांपासून तक्रारी करूनही याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार कविता सुरंजे या महिलेने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीत याबाबतचा तक्रारअर्ज शेजारच्या चारकोप पोलीस ठाण्याकडे पाठवल्याचे आश्चर्यकारक माहिती पोलिसांनी दिली आहे. मालाड येथे राहाणाऱ्या कविता हिचा शहापूर येथील आसनगाव येथे राहाणाऱ्या देविदास सुरंजे याच्याही विवाह झाला. विवाहानंतर दिड -दोन वर्षांपासून पती तसेच दिर, जाऊ, सासू, सासरा, नणंद यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची कविताची तक्रार आहे. याबाबत तिने ५ मे २0१३ रोजी मालाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. २९ सप्टेंबर २0१३ रोजी मालाड पोलिसांनी कविताचा जबाब नोंदवला. त्यानंतर कविताने १ आॅक्टोबर २0१३ रोजी अदखलपात्र तक्रारही दाखल केली. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण समझोत्यासाठी महिला सहाय्य कक्षाकडे पाठवले. तेथे आपल्या पतीने यापुढे आपला छळ करणार नाही आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करू, असे लेखी पत्र दिले. मात्र पुन्हा शहापूर येथे गेल्यावर बेदम मारहाण करून आपला छळ सुरू झाला. त्याबाबतही शहापूर पोलीस ठाण्यातही अदखलपात्र तक्रार नोंदवली व आपण मालाड येथे माहेरी आल्याचे कविताने सांगितले. पोलिसांनी याबाबत कोणतीच कारवाई न केल्याने राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत मालाड पोलीस ठाण्याकडे माहिती अधिकारामार्फत माहिती मागितली असता कविता सुरंजे यांचा अर्ज मालाड पोलीस ठाण्याला प्राप्त झाला असून तो पुढील चौकशीसाठी चारकोप पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. तक्रारदार महिला मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाते. तिच्या शारीरिक आणि मानसिक छळाच्या तक्रारीबाबत चौकशी करून कारवाई करण्याऐवजी तक्रारअर्ज कोणताही संबंध नसलेल्या चारकोप पोलीस ठाण्याकडे पाठवणे आश्चर्यकारक असल्याने याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)