शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

विकास योजनेतील रस्त्यांवरील अतिक्रमणे रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST

कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे ...

कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळ व मनपा अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी आयुक्तांची एक बैठक झाली. या वेळी त्यांनी वरील आदेश दिले. दुर्गाडी ते सहजानंद चौक, दुर्गाडी ते पत्रीपूल या रस्त्यावरील बहुतांश दुभाजक तुटले असून, ते प्राधान्याने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी महामंडळाला दिल्या. दरवर्षी पावसाळ्यात शिवाजी चौकात पाणी तुंबते. त्यावर तोडगा काढण्यासाठी जल, मल, मोबाइल कंपन्यांच्या सेवा वाहिन्या शिफ्ट केल्या पाहिजेत. महापालिकेने त्याचा अभ्यास करावा. रस्ता रुंदीकरणाची निविदा प्रक्रिया राबवावी. रस्ता रुंदीकरण करताना तेथे क्रॉस ड्रेन तयार करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

भटाळे तलावातील प्रस्तावित विकास योजना रस्ता तसेच इतर आरक्षणाखाली अतिक्रमणे काढण्याचे निर्देश मनपा उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना मनपा आयुक्तांनी दिले आहेत. बाधित अतिक्रमणांमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी पुनवर्सन समितीपुढे तातडीने सादर करावा, असेही आयुक्तांनी या बैठकीत आदेशित केले आहे.

-------------------------