शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

गोमांस विक्री अन तस्करी रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या देशभरातील महामार्गांवर चौक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:33 IST

गोवंश हत्या बंदीच्या नावावर देशभरात आतापर्यंत झालेल्या हिंसाच्या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता, जे गोवंश हत्याबंदीच्या नावावर आपली दुकाने चालवित होते किंवा आहेत त्यांचा आमच्या संघटनांशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला

ठळक मुद्देदेशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही मोठ्याप्रमाणावर गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी मात्र, पोलीस त्याकडे डोळे झाक करतात, महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप

ठाणे : गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा विभागाच्या वतीने चौक्या उभारणार असल्याचे विश्व विन्दू परिषदेच्या गोरक्षा विभागाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष गुरूप्रसाद सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या चौक्यांवर असणारे गोरक्षक गायींचे मांस आढळून आल्यास हे गोरक्षक कोणतीही कारवाई करणार नाहीत. मात्र, ही बाब पोलिसांच्या निर्दशनास आणून देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही मोठ्याप्रमाणावर गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी होते. मात्र, पोलीस त्याकडे डोळे झाक करतात, कायदा असूनही महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करून कत्तलखान्यांमध्ये डीएनए चाचणी यंत्रणा, टोल नाक्यांवर स्कॅनिंग मशीन बसविण्यात यावेत, अशा मागण्याही यांनी यावेळी केल्या.संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवंश हत्या बंदीच्या नावावर देशभरात आतापर्यंत झालेल्या हिंसाच्या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता, जे गोवंश हत्याबंदीच्या नावावर आपली दुकाने चालवित होते किंवा आहेत त्यांचा आमच्या संघटनांशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. भारतात गायींच्या ४१ प्रजाती आहेत. त्यातील काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आल्याने आपण जागे झाले आहोत, असे ते म्हणाले. यावेळी परिषदेच्या कोकण प्रांतांचे लक्ष्मीनारायण चांडक, राजेंद्र पाटील उपस्थितीत होते.

आपल्या देशातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्वी गायींवरच अंवलबून होती, आपल्याकडच्या गायी या देशातील सर्व प्रकारच्या तापमानात वास्तव्य करू शकतात, आपल्या प्रजातींच्या गायींच्या दुधांच्या सेवनामुळे प्रतिकार शक्तीत वाढ होते, हे सिध्द झाले आहे. त्याचबरोबर गायीचे शेण आणि गोमूत्र हे देखील औषधी आहे, या दोन्हींचा वापर करून त्यावर औषधेही तयार केली आहेत, ही औषधे गुणकारी असल्याचे सिध्द झाल्याने या औषधांना मागणी वाढत असल्याचा दावा सिंह यांनी केला. मात्र आपल्या देशात गायींची महती आणि त्यांचा उपयोग आपण विसरत गेल्याने आपल्याकडे शेणखता ऐवजी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढल्याने आपण रोज अन्नातून विषच सेवन करत आहोत, आपण सेवन करत असलेल्या अन्नातून आपल्याला पोटात आपण एकप्रकारे विषच सेवन करत आहोत, हे सगळे आपण गायींकडे दुर्लक्ष करत असल्याने घडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक