शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

मुंबई-नागपूर समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:59 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे.

आसनगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत धानके तक्रार करणार असल्याचे समजताच ते संमतीपत्र फाडून टाकण्यात आल्याचा आरोप गायकर यांच्यावर करण्यात आला, पण तो गायकर यांनी फेटाळून लावला.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या या दबंगगिरीबद्दल या विधवेच्या परदेशातील मुलींना कळताच, त्यांनी भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी तसेच कर्मचाºयांना दिला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाºयांनी संमतीपत्र फाडूनच टाकले. मात्र, अधिकाºयांच्या धाकदपटशाने घाबरलेल्या या महिलेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे.वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३८१ मधील १ हेक्टर ७४ गुंठे, गट नं. ३७४ मधील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गाखाली जाणार आहे. या शेतजमिनी विशाखा विनायक धानके आणि त्यांच्या मुली रिमासचिन पवार आणि रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आज कोणतेही कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजुरांना लागवडीसाठी देऊन अनेक वर्षांपासून कसली जात आहेत. समृद्धीच्या जमीन खरेदीसाठी महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आणि त्यांच्या कर्मचाºयांनी कार्यालयात बोलावून दमबाजी केली. या जमिनींवर आदिवासींनी हक्क सांगितला असून जमीनविक्रीच्या पैशांतील काही पैसे आम्हाला तसेच आदिवासींना द्यावे लागणार असल्याचे सांगत संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप धानके यांनी केला.गोंधळलेल्या धानके यांनी हा प्रकार लंडन येथे स्थायिक असलेल्या मुलींना सांगितला. त्यांनी रेवती गायकर यांच्याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा देताच ते संमतीपत्र अधिकाºयांनी फाडून त्याचे फोटो मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. मात्र, भेदरलेल्या धानके यांनी ठाणे पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.