शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:59 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे.

आसनगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत धानके तक्रार करणार असल्याचे समजताच ते संमतीपत्र फाडून टाकण्यात आल्याचा आरोप गायकर यांच्यावर करण्यात आला, पण तो गायकर यांनी फेटाळून लावला.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या या दबंगगिरीबद्दल या विधवेच्या परदेशातील मुलींना कळताच, त्यांनी भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी तसेच कर्मचाºयांना दिला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाºयांनी संमतीपत्र फाडूनच टाकले. मात्र, अधिकाºयांच्या धाकदपटशाने घाबरलेल्या या महिलेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे.वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३८१ मधील १ हेक्टर ७४ गुंठे, गट नं. ३७४ मधील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गाखाली जाणार आहे. या शेतजमिनी विशाखा विनायक धानके आणि त्यांच्या मुली रिमासचिन पवार आणि रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आज कोणतेही कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजुरांना लागवडीसाठी देऊन अनेक वर्षांपासून कसली जात आहेत. समृद्धीच्या जमीन खरेदीसाठी महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आणि त्यांच्या कर्मचाºयांनी कार्यालयात बोलावून दमबाजी केली. या जमिनींवर आदिवासींनी हक्क सांगितला असून जमीनविक्रीच्या पैशांतील काही पैसे आम्हाला तसेच आदिवासींना द्यावे लागणार असल्याचे सांगत संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप धानके यांनी केला.गोंधळलेल्या धानके यांनी हा प्रकार लंडन येथे स्थायिक असलेल्या मुलींना सांगितला. त्यांनी रेवती गायकर यांच्याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा देताच ते संमतीपत्र अधिकाºयांनी फाडून त्याचे फोटो मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. मात्र, भेदरलेल्या धानके यांनी ठाणे पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.