शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

"सध्याचा काळ हा भाषेच्या अभद्रीकरणाचा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:23 IST

भाषेच्या अभद्रीकरणाचा सध्याचा काळ आहे. ना धड मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी बोलली जात आहे.

ठाणे : भाषेच्या अभद्रीकरणाचा सध्याचा काळ आहे. ना धड मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी बोलली जात आहे. या भाषा अभद्रीकरणाच्या काळात राम गणेश गडकरींचे साहित्य नव्या पिढीने वाचले, तर मराठी सुधारण्यास सुरुवात होईल. कोणती तरी एक भाषा नीट बोला. भाषा नीट नसल्याने काचेच्या पडद्यावर वाचतात, पण काळजाचा पडदा रिकामा राहतो. गडकरींचे समग्र वाड्.मय कोहिनूर हिऱ्यासारखे आहे. पुढचा काळ तरुण पिढीने हा कोहिनूर शोधण्यात घालवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थेतर्फे आयोजित भाषाप्रभू कै. राम गणेश गडकरी स्मृती शताब्दी सांगता समारंभ बुधवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी प्रा. दवणे बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक श्वास ज्यांचा शब्द झाला आणि प्रत्येक शब्द ज्यांचा श्वास झाला, असे राम गणेश गडकरी होत. ३४ वर्षांच्या आयुष्यात गडकरी ३३४ वर्षे आयुष्य जगले. त्यांना ‘राजहंस’ म्हटले, ते सर्वार्थाने योग्य आहे. समग्र आयुष्यात त्यांनी एकाकीपणा, मानहानी सहन केली. ते सहन करताकरता त्यांनी भावबंधन लिहिले आणि आपले प्राण सोडले. गडकरी यांच्या हृदयात लोकमान्य टिळक, मेंदूत गोपाळ गणेश आगरकर होते. शतकानुशतकांच्या शोषणाला प्रश्न विचारणारी, येणाºया शतकाला सामोरी जाणारी गडकरींची ‘एकच प्याला’मधील गीता मला मोलाची वाटते. कारण, ती विद्रोहाची ठिणगी टाकणारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रा. दवणे, डॉ. अनंत देशमुख, डॉ. प्रतिभा कणेकर, प्रा.डॉ. सुरेखा सबनीस लिखित ‘राम गणेश गडकरी... एक राजहंस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बडोद्याच्या आमदार सीमा मोहिले, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य, सचिव संजय दिघे उपस्थित होते.पुस्तकामागची पार्श्वभूमी सांगताना डॉ. देशमुख म्हणाले की, या पुस्तकातील लेखन हे अत्याधुनिक पद्धतीने झाले आहे. नाटक आणि रंगभूमीचा, कवितेचा, मराठी विनोदी लेखनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ज्यांचे गडकरींवर प्रेम आहे, त्यांना हे पुस्तक संग्रही असावे, असे वाटेल. आ. मोहिले यांनी मायबोली आत्मसात करण्यासाठी साहित्य वाचणे आवश्यक आहे. माझी जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी गुजरात झाली. गडकरी हे मोठे साहित्यकार होते. मान्यवर नाटककारांच्या नाट्यसंपदेवर आधारित ‘नाट्य व संगीत’ यांची सांगड घालणारा अनोखा कार्यक्रम पार पडला.>अचूक टायमिंग साधणे हेच बाळासाहेबांचे वैशिष्ट्य : प्रधानबाळासाहेब ठाकरे यांची नव्याने ओळख या विषयावर बोलताना संदीप प्रधान यांनी त्यांच्या आठवणी उलगडल्या. ते म्हणाले की, बाळासाहेब रोखठोक राजकारणी होते. ते अचूक टायमिंग साधणारे नेते होते. बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली असेल, तर मला अभिमान आहे, असे उद्गार बाळासाहेबांनी काढल्यामुळे आजही राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेला आक्रमक भूमिका घेणे शक्य झाले. त्यांच्या अचूक निर्णयाचा शिवसेनेला आजही लाभ होत आहे. ८० टक्के समाजकारणामुळे शिवसेना ही आजही तळागाळात रुजलेली आहे.