शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मद्याच्या आहारी गेलेल्या गरोदर बारबाला पत्नीची पतीनेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:06 IST

भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील  गरोदर असताना ती  मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली ...

ठळक मुद्देमुलाच्या हट्टासाठी शेतकरी कुटूंबाने बारबालेशी लावले लग्नगरोदर स्थितीत दारूच्या आहारी गेलेल्या पत्नीचा गळा घोटलापोलीसांनी पंचासमोर जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला

भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील  गरोदर असताना ती  मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तालुक्यातील अनगाव येथे रहाणारा कल्पेश ठाकरे याचे सुमारे अडीच वर्षांपूर्वी मुंबईतील बारबाला माई हिच्याशी प्रेमसंबंध जुळून आले. या प्रेमसंबधानंतर त्यांनी रजीस्टर विवाह केला. ही बाब त्याच्या घरी कळाल्यानंतर कल्पेशच्या घरातील सर्वांनी दोघांचे रितीरिवाजानुसार लग्न करून दिले.या प्रसंगी राजस्थानवरून मुलीच्या घरातील कुटूंब आले होते.आनगावमध्ये रहात असताना या विवाहितेने संसाराची व समाजाची पर्वा न करता गरोदर स्थितीत ती दारू आणि सिगारेटच्या आहारी गेली. त्यामुळे ठाकरे कुटूंबांनी आंबाडी येथे दोघांना भाड्याने फ्लॅट घेऊन दिला. तेथे तीच्या दारू पिण्यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्यांचे भांडण विकोपाला गेल्यानंतर रविवारी रात्री दरम्यान कल्पेशने तीची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह आनगांव मधील घराच्या मागील जमीनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्पेश सुदाम ठाकरे याने गणेशपुरी पोलीस ठाण्यात आपली पत्नी माई ही सोमवार पासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि तीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडे दगादा लावला.त्यामधून तपास सुरू असताना पोलीसांनी कल्पेशला पोलीसी हिसका दाखविताच त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पुरलेली जागा पोलीसांना दाखविली. सोमवार रोजी सकाळी या जागेवर ग्रामिण पोलीस उप अधीक्षक काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर ढोबे यांनी घटनास्थळी पंच म्हणून नायब तहसीलदार प्रकाश पाटील आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातीत पुरलेला माईचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी कल्पेश ठाकरे यांस अटक केली आहे. आनगावातील प्रतिष्ठीत शेतकरी कुटूंबांनी केलेल्या सत्कर्माने मुलाचे भविष्य न बनता त्याची अखेर अशी झाल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून