शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाण्यात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:09 IST

मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली.

ठाणे : मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली. तसेच देशात घातपाती कारवायांचा काही अतिरेकी संघटनांनी इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिली.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिमंडळांमधील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच ठाणे ग्रामीणच्या परिसरातील सागरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात खास टेहळणी आणि गस्ती पथके तैनात केल्याची माहिती सूत्रांनीदिली.ठाण्यात पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अविनाश अंबुरे तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आलीआहे.मोक्याच्या ठिकाणांसह मुंब्रा, भिवंडी, राबोडी, कल्याण आणि ठाणे शहर तसेच मीरा रोड आणि भार्इंदर अशा संवेदनशील ठिकाणी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून सुरक्षा व्यवस्थेमध्येही वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची तपासणी करण्यात येत आहे. शहरात येणाऱ्या आणि जाणाºया मार्गांवरही नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे.मार्केट, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाºया कार्यक्रमांच्या ठिकाणी जलद प्रतिसाद दल, श्वानपथक, बीडीडीएसची पथकं गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयांद्वारेही संवेदनशील ठिकाणांवर लक्ष असल्याची माहिती सूत्रांनीदिली.नागरिकांनीदेखील भीती न बाळगता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच संशयास्पद वस्तूला हात लावू नये. एखादी व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केलेआहे.>प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मॉल, मार्केट आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच चौकाचौकांमध्ये तपासणीही करण्यात येत आहे. हॉटेल, लॉज तसेच संशयास्पद ठिकाणीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे.- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर