शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:41 IST

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये प्रा. सुभाष वारे यांनी आपले मनोगत मांडले

ठळक मुद्देसामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांचे ठाण्यात प्रतिपादन समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिका संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत - प्रा. सुभाष वारे

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

ठाणे : ‘संविधानाने भारतातील सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरूषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपलं संविधान ही एक रक्त न सांडता झालेली क्रांती आहे कारण आपल्या संविधानाने 21 वर्षांवरील सर्व स्त्री पुरूषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रीयांना सुद्धा किती वर्ष लढा द्यावा लागला होता. आपल्या देशातील प्रश्न हे संविधांनातील कमतरतेमुळे नाहीत तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत.’ असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. 

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये कोपरी संघर्ष समितीच्या सहयोगाने आयोजित कोपरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ’संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरंच काही आहे. शेतकर्‍यांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याचे उत्तरही संविधानाच्या योग्य  अंमलबजावणीत आहे. संविधनाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे म्हणून गरीब खुश आहेत, आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून श्रीमंत खुश आहेत. संविधानाचे महत्व पटवून घ्यायचे असेल तर संविधान नव्हतं तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी,धर्मवादी, व्यक्तीस्वातंत्र्यविरोधी कायदे होते ते आधी समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाईंना शिक्षण घेण्यास आणि देण्यास प्रखर विरोध झाला कारण त्या वेळेच्या धर्मांच्या कायद्यानुसार स्त्रियांनी आणि शुद्रांनी शिक्षण घेणं हे पाप समजलं जात होतं. संविधानाने सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरूषांना शिक्षणाचा अधिकार दिला,रोजगार मिळवण्याचा आणि जगण्यासाठी साधने मिळवण्याचा अधिकार दिला. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही, ती हमी फक्त नागरिकांची सामुहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून संविधान अभ्यासून, समजुन घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही आहे तर घरासाठीही संविधान लागू आहे.’

      या वेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संगितले की,’ आज समाजात जाती व्यवस्थेमुळे आणि धर्म व्यवस्थेमुळे जी उथळ–पुथळ  होते आहे ती संविधांनाबद्दलच्या गैरसमजाने होते आहे. संविधान नीट समजून घेणं ही आजची गरज आहे.’ या प्रसंगी‘समता विचार प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि,’आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे.’ संस्थेचे सह खजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना केली तर कोपरी संघर्ष समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

      या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलेल्या श्रोत्यांमधे समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया,उमाकांत पावसकर, मतदाता जागरण अभियानचे मंगेश खातू, डॉ. चेतना दिक्षीत, अविनाश आणि सुनीती मोकाशी, कोपरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि त्या भागातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक