शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:41 IST

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये प्रा. सुभाष वारे यांनी आपले मनोगत मांडले

ठळक मुद्देसामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांचे ठाण्यात प्रतिपादन समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिका संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत - प्रा. सुभाष वारे

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

ठाणे : ‘संविधानाने भारतातील सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरूषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपलं संविधान ही एक रक्त न सांडता झालेली क्रांती आहे कारण आपल्या संविधानाने 21 वर्षांवरील सर्व स्त्री पुरूषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रीयांना सुद्धा किती वर्ष लढा द्यावा लागला होता. आपल्या देशातील प्रश्न हे संविधांनातील कमतरतेमुळे नाहीत तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत.’ असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. 

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये कोपरी संघर्ष समितीच्या सहयोगाने आयोजित कोपरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ’संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरंच काही आहे. शेतकर्‍यांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याचे उत्तरही संविधानाच्या योग्य  अंमलबजावणीत आहे. संविधनाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे म्हणून गरीब खुश आहेत, आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून श्रीमंत खुश आहेत. संविधानाचे महत्व पटवून घ्यायचे असेल तर संविधान नव्हतं तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी,धर्मवादी, व्यक्तीस्वातंत्र्यविरोधी कायदे होते ते आधी समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाईंना शिक्षण घेण्यास आणि देण्यास प्रखर विरोध झाला कारण त्या वेळेच्या धर्मांच्या कायद्यानुसार स्त्रियांनी आणि शुद्रांनी शिक्षण घेणं हे पाप समजलं जात होतं. संविधानाने सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरूषांना शिक्षणाचा अधिकार दिला,रोजगार मिळवण्याचा आणि जगण्यासाठी साधने मिळवण्याचा अधिकार दिला. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही, ती हमी फक्त नागरिकांची सामुहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून संविधान अभ्यासून, समजुन घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही आहे तर घरासाठीही संविधान लागू आहे.’

      या वेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संगितले की,’ आज समाजात जाती व्यवस्थेमुळे आणि धर्म व्यवस्थेमुळे जी उथळ–पुथळ  होते आहे ती संविधांनाबद्दलच्या गैरसमजाने होते आहे. संविधान नीट समजून घेणं ही आजची गरज आहे.’ या प्रसंगी‘समता विचार प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि,’आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे.’ संस्थेचे सह खजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना केली तर कोपरी संघर्ष समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

      या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलेल्या श्रोत्यांमधे समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया,उमाकांत पावसकर, मतदाता जागरण अभियानचे मंगेश खातू, डॉ. चेतना दिक्षीत, अविनाश आणि सुनीती मोकाशी, कोपरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि त्या भागातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक