शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:41 IST

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये प्रा. सुभाष वारे यांनी आपले मनोगत मांडले

ठळक मुद्देसामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांचे ठाण्यात प्रतिपादन समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिका संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत - प्रा. सुभाष वारे

‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे

ठाणे : ‘संविधानाने भारतातील सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरूषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपलं संविधान ही एक रक्त न सांडता झालेली क्रांती आहे कारण आपल्या संविधानाने 21 वर्षांवरील सर्व स्त्री पुरूषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रीयांना सुद्धा किती वर्ष लढा द्यावा लागला होता. आपल्या देशातील प्रश्न हे संविधांनातील कमतरतेमुळे नाहीत तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत.’ असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. 

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये कोपरी संघर्ष समितीच्या सहयोगाने आयोजित कोपरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ’संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरंच काही आहे. शेतकर्‍यांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याचे उत्तरही संविधानाच्या योग्य  अंमलबजावणीत आहे. संविधनाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे म्हणून गरीब खुश आहेत, आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून श्रीमंत खुश आहेत. संविधानाचे महत्व पटवून घ्यायचे असेल तर संविधान नव्हतं तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी,धर्मवादी, व्यक्तीस्वातंत्र्यविरोधी कायदे होते ते आधी समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाईंना शिक्षण घेण्यास आणि देण्यास प्रखर विरोध झाला कारण त्या वेळेच्या धर्मांच्या कायद्यानुसार स्त्रियांनी आणि शुद्रांनी शिक्षण घेणं हे पाप समजलं जात होतं. संविधानाने सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरूषांना शिक्षणाचा अधिकार दिला,रोजगार मिळवण्याचा आणि जगण्यासाठी साधने मिळवण्याचा अधिकार दिला. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही, ती हमी फक्त नागरिकांची सामुहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून संविधान अभ्यासून, समजुन घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही आहे तर घरासाठीही संविधान लागू आहे.’

      या वेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संगितले की,’ आज समाजात जाती व्यवस्थेमुळे आणि धर्म व्यवस्थेमुळे जी उथळ–पुथळ  होते आहे ती संविधांनाबद्दलच्या गैरसमजाने होते आहे. संविधान नीट समजून घेणं ही आजची गरज आहे.’ या प्रसंगी‘समता विचार प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि,’आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे.’ संस्थेचे सह खजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना केली तर कोपरी संघर्ष समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

      या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलेल्या श्रोत्यांमधे समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया,उमाकांत पावसकर, मतदाता जागरण अभियानचे मंगेश खातू, डॉ. चेतना दिक्षीत, अविनाश आणि सुनीती मोकाशी, कोपरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि त्या भागातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक