शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

‘विद्यादान’मुळेच लाभले आमच्या पंखांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:41 IST

कार्यकर्त्यांची भावना : आज गुणगौरव

ठाणे : आर्थिक अडचणींमुळे गुणवत्ता असून अनेकांना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा मुलांना हेरून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळाकडून केले जात आहे. केवळ शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देऊ न न थांबता, चांगली माणसे घडवून आमच्या आशाआकांक्षा उंचावण्याचे काम मंडळाने केल्यानेच आम्ही घडल्याची भावना मंडळाचे कार्यकर्ते पवन वाढे, निलेश हरड आणि कविता बिडवे यांनी व्यक्त केल्या.

शिक्षणामुळे उत्तम समाज घडू शकतो, या विश्वासातून १५ आॅगस्ट २००८ रोजी ठाण्यातील समविचारी व्यक्तींनी विद्यादान मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. मंडळाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण होत असून, आता संपूर्ण राज्यभरात हे मंडळ हातपाय विस्तारत आहे. शनिवारी या मंडळाच्या मदतीमुळे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे.

शहापूर तालुक्यातील पवन वाढे हा मंडळाचा कार्यकर्ता आहे. मंडळाच्या मदतीमुळे तो इलेक्ट्रिकल डिस्ट्रिब्युटर म्हणून नावारूपाला आला. वाढे म्हणाला की, माझे वडील व्यसनाच्या आहारी जाऊ न कर्जबाजारी झाले होते. मंडळाने मदत करून माझे मनोधैर्य वाढवले. दहावीनंतर मला नाशिक येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळाला. मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. मंडळ नसते, तर असा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो, अशा शब्दात पवनने भावना व्यक्त केल्या.

शहापूर तालुक्यातील खारिवली गावचा निलेश हरड याचा पत्रकार सुभाष हरड यांच्या माध्यमातून मंडळाशी संपर्क आला. दहावीनंतर मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन ‘बीएससी अ‍ॅग्रीकल्चर’ हा पर्याय निवडला आणि तेव्हाच स्पर्धा परीक्षा देण्याचे मनाशी पक्के केले. त्यानंतर एक वर्ष कंपनीत काम केले. आता ठाणे महापालिकेत कंत्राटावर उद्यान तपासनीस म्हणून काम करत आहे. त्याचबरोबरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करत आहे. मंडळाच्या कार्याचा अभिमान वाटतो, असे निलेशने सांगितले.

ठाण्यातील कविता बिडवे म्हणाली की, मला मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससीला प्रवेश घ्यायचा होता. पण, फी परवडत नव्हती. महाविद्यालयांचा शोध घेत असताना राधिका जोशी यांनी मला मंडळाबाबत सांगितले. त्या ठिकाणी आल्यावर गीता शहा यांनी सीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुचवले. २०१६ मध्ये बीएससी पूर्ण झाले. सध्या फार्मसी क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी करत आहे. मंडळाने सर्वांगीण विकास होण्यासाठीही मदत केली आहे.आयुष्य घडवणारी संस्थाविद्यादान सहायक मंडळाच्या मदतीने डॉक्टर, इंजिनीअर, नर्स, उपयोजित कला शाखा आणि विविध विद्या शाखांमध्ये २८५ विद्यार्थी शिकत आहेत. तर, साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ न स्वत:च्या पायावर भक्कम उभे आहेत.ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊ नानिवडेकर, गीता शहा, रंजना कुलकर्णी, स्वाती आगटे या आणि अशा अनेक संवेदनशील व्यक्तींनी सामाजिक जाणीव जपण्याच्या दिशेने १० वर्षांपूर्वी टाकलेले हे सकारात्मक पाऊल अनेकांचे आयुष्य घडवत आहे. ठाणे, पुणे, बोरिवली, शहापूर, नागपूर अशा पाच शाखांतून या मंडळाचा विस्तार झाला आहे.