शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘विद्यादान’मुळेच लाभले आमच्या पंखांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:41 IST

कार्यकर्त्यांची भावना : आज गुणगौरव

ठाणे : आर्थिक अडचणींमुळे गुणवत्ता असून अनेकांना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा मुलांना हेरून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळाकडून केले जात आहे. केवळ शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देऊ न न थांबता, चांगली माणसे घडवून आमच्या आशाआकांक्षा उंचावण्याचे काम मंडळाने केल्यानेच आम्ही घडल्याची भावना मंडळाचे कार्यकर्ते पवन वाढे, निलेश हरड आणि कविता बिडवे यांनी व्यक्त केल्या.

शिक्षणामुळे उत्तम समाज घडू शकतो, या विश्वासातून १५ आॅगस्ट २००८ रोजी ठाण्यातील समविचारी व्यक्तींनी विद्यादान मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. मंडळाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण होत असून, आता संपूर्ण राज्यभरात हे मंडळ हातपाय विस्तारत आहे. शनिवारी या मंडळाच्या मदतीमुळे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे.

शहापूर तालुक्यातील पवन वाढे हा मंडळाचा कार्यकर्ता आहे. मंडळाच्या मदतीमुळे तो इलेक्ट्रिकल डिस्ट्रिब्युटर म्हणून नावारूपाला आला. वाढे म्हणाला की, माझे वडील व्यसनाच्या आहारी जाऊ न कर्जबाजारी झाले होते. मंडळाने मदत करून माझे मनोधैर्य वाढवले. दहावीनंतर मला नाशिक येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळाला. मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. मंडळ नसते, तर असा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो, अशा शब्दात पवनने भावना व्यक्त केल्या.

शहापूर तालुक्यातील खारिवली गावचा निलेश हरड याचा पत्रकार सुभाष हरड यांच्या माध्यमातून मंडळाशी संपर्क आला. दहावीनंतर मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन ‘बीएससी अ‍ॅग्रीकल्चर’ हा पर्याय निवडला आणि तेव्हाच स्पर्धा परीक्षा देण्याचे मनाशी पक्के केले. त्यानंतर एक वर्ष कंपनीत काम केले. आता ठाणे महापालिकेत कंत्राटावर उद्यान तपासनीस म्हणून काम करत आहे. त्याचबरोबरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करत आहे. मंडळाच्या कार्याचा अभिमान वाटतो, असे निलेशने सांगितले.

ठाण्यातील कविता बिडवे म्हणाली की, मला मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससीला प्रवेश घ्यायचा होता. पण, फी परवडत नव्हती. महाविद्यालयांचा शोध घेत असताना राधिका जोशी यांनी मला मंडळाबाबत सांगितले. त्या ठिकाणी आल्यावर गीता शहा यांनी सीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुचवले. २०१६ मध्ये बीएससी पूर्ण झाले. सध्या फार्मसी क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी करत आहे. मंडळाने सर्वांगीण विकास होण्यासाठीही मदत केली आहे.आयुष्य घडवणारी संस्थाविद्यादान सहायक मंडळाच्या मदतीने डॉक्टर, इंजिनीअर, नर्स, उपयोजित कला शाखा आणि विविध विद्या शाखांमध्ये २८५ विद्यार्थी शिकत आहेत. तर, साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ न स्वत:च्या पायावर भक्कम उभे आहेत.ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊ नानिवडेकर, गीता शहा, रंजना कुलकर्णी, स्वाती आगटे या आणि अशा अनेक संवेदनशील व्यक्तींनी सामाजिक जाणीव जपण्याच्या दिशेने १० वर्षांपूर्वी टाकलेले हे सकारात्मक पाऊल अनेकांचे आयुष्य घडवत आहे. ठाणे, पुणे, बोरिवली, शहापूर, नागपूर अशा पाच शाखांतून या मंडळाचा विस्तार झाला आहे.