शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

401 गावांत पाणीटंचाईमुळे महिलांच्या डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:35 IST

मार्चमध्येच तीव्र झळा : टॅंकरद्वारे करावा लागणार पाणीपुरवठा

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्याला नैसर्गिक पाण्याचे स्राेत लाभलेले आहेत. मुबलक पाण्याचे वैभव लाभलेल्या या जिल्ह्यातील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही १०७ गावे आणि २९४ पाडे आदी ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांशी गावपाड्यातील महिला डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण करत आहेत.

जागतिक दर्जाच्या बृहन्मुंबईच्या नगर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती आदी शहरांना या गावपाड्यांच्या शेजारील धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणातील पाण्याचा लाभ या गावपाड्यांच्या पाणीपुरवठ्याला तसेच शेती सिंचनासाठी  मिळत नसल्याची खंत  ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यंदाही ४०१ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यावर दरवर्षाप्रमाणे यंदाही ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या नियोजनाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. मुंबईसह जिल्ह्यातील महानगरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात धन्यता मानणारे पाडे प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात असतात.  त्यांच्या या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी रुपये खर्च होतात. यंदाही १०७ गावे २९४ पाडे आणि  १३४ पाणीपुरवठा योजनांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी तीन कोटी ८२ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे. 

पाणीटंचाईसाठी आराखडा तयारयंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहेत. या खर्चातून ७६ गावे, ५२ पाडे आणि १२९ नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यावर तब्बल १८ कोटी ९९ लाखांचा खर्च होणार आहे. सहा गावांच्या व ११ पाड्यांच्या आणि १७ योजनांच्या कूपनलिकांच्या दुरुस्तीलाही चार लाख रुपये खर्चाची तजवीज केली आहे.

शहापूरची धरणांचा तालुका म्हणून ओळखठाणे : शहापूर तालुक्यातील ७५ गावे, २४५ पाडे आणि १०६ योजनांसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी तीन कोटी चार लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याप्रमाणेच मुरबाडच्या २४ गावांसह ३८ पाडे आणि २१ योजना, भिवंडीचे आठ गावपाडे, तीन पाणीपुरवठा योजना आणि अंबरनाथमधील ११ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठाशहापूर तालुक्यातील कसारा, खर्डी, वाशाळा आदी गावांसह परिसरातील पाड्यांमध्ये सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यांना त्वरित बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या गावांच्या दौऱ्याप्रसंगी शनिवारी केली आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कोटी ८२ लाखांची तरतूद केली आहे.

तात्पुरत्या योजनांवर सात कोटी ९३ लाखांचा खर्च जिल्ह्यातील १५ गावे, १३ पाडे आणि २४ पाणीपुरवठा योजनांना तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी ९३ लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याणची आठ गावे, तीन पाडे आणि दहा पाणीपुरवठा योजनांच्या तात्पुरत्या पाण्यासाठी दोन कोटी १९ लाखांचा खर्च होईल. तर शहापूरच्या चार गावांसह आठ पाडे आणि १२ योजनांवरही साडेतीन कोटींचा खर्च होणार आहे. मुरबाडच्या दोन योजना, सहा गावपाड्यांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांवर दोन कोटी २० लाख खर्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी