शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप

By जितेंद्र कालेकर | Updated: July 7, 2024 19:02 IST

एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ५०० पेक्षा जास्त खड्डे : खड्ड्यामुळेच पावसाळ्यात जातात बळी, मनसेचा आरोप

ठाणे: घोडबंदरच्या रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेक अपघात होत असतानाही घोडबंदर रस्त्याचा दर्जा सुधारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे घोडबंदर रस्त्यावरून स्पष्ट होत आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असून त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग ,एमएमआरडीए, मेट्रो प्रकल्प तसेच ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून देखभाल केली जाते. सेवा रस्ता ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येतो. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी घोडबंदर रस्त्यावरील दुरवस्थेमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून घोडबंदरवर पडलेल्या मोठया खड्ड्यामुळेच पावसाळ्यात नाहक बळी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

घोडबंदर मार्गावर नेहमीच वाहतूकीची वर्दळ असते. याचबरोबर पनवेल जेएनपीटी, नाशिक ,अहमदाबाद, राजस्थान येथे जाणारी मालवाहू वाहनेही याच महामार्गावरून जातात. हा रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सर्व प्राधिकारणाची आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दरवर्षीॅ हा रस्ता खड्डेमत होत असल्याचे प्रमुख कारण संबंधित प्राधिकरणामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. संबंधित प्राधीकरणाविरोधात वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी तक्रार करूनही प्रशासन कारवाई करीत नसल्याचा नसल्याचा आराेप हाेत आहे. या सेवा रस्त्यावर जागोजागी एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वतीने खोदकाम केले आहे. पावसाळ्यात मुख्य राज्य महामार्ग वाहतूक कोंडीमध्ये अडकला असल्यास सेवा रस्त्याच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात होते. पण त्यालाही एमएमआरडीएच्या नियोजनाअभावी ब्रेक लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रस्त्यावर संबंधित सर्व प्राधिकरणाने रस्त्याची कामे व्यवस्थितरित्या करून घेणे अपेक्षित असते. वषार्नुवर्षे ही कामे योग्यरित्या होत नसल्यामुळे रस्ता पावसाळ्यात खड्डेमय झाला आहे. तर या मार्गावरील एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या वतीने सांभाळण्यात येणाऱ्या बहुतेक पूलांवर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक संतगती होत असून अपघाताच्या घटनाही दररोज समोर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे आवश्यकघोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग आहे. मुख्यमंत्री ठाणे जिल्हयाचे असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष हाेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित क्षेत्रात येणारे रस्ते महानगरपालिकेला हस्तांतरण करून त्यांनी ते सांभाळणे, असे सूचित केले आहे. तरीही ही कामे केली जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग, महाराष्ट्र नवनिमार्ण सेना, मनसे

 

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे