शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

टपाल कार्यालय झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:36 IST

भाड्याच्या जागेतून कारभार : कर्मचारी भीतीच्या छायेत

मीरा रोड : गेली ३२ वर्षे भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या जागेत टपाल कार्यालय सुरू आहे. पण, काही वर्षांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत हे कार्यालय असून कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणारे नागरिक जीव मुठीत धरून वावरतात. शहरात टपाल कार्यालयासाठी असणारी चार आरक्षणे विकसित केली जात नसताना दुसरीकडे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णयही अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे.

भार्इंदर पूर्वेला बाळाराम पाटील मार्गावर असलेल्या श्रीगणेश कृपा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १९८६ पासून भाड्याने टपाल कार्यालय सुरू आहे. सुरुवातीला असलेल्या १० टपाल कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आज ४५ च्या घरात पोहोचली आहे. पण, कामाचा वाढलेला पसारा पाहता, आहे ते कर्मचारीही अपुरे पडत आहेत. टपाल कार्यालय सुरू होऊन ३२ वर्षे झाली, तरी या कार्यालयाची अंतर्गत दुरुस्ती झाली नाही. शिवाय, इमारतही धोकादायक झाली आहे. कार्यालयातील छताचे व भिंतीचे प्लास्टर कोसळले असून आतील सळया बाहेर आल्या आहेत. कॉलम व बिमना तडे गेले आहेत. २००६ मध्ये तर मनोजकुमार पांडे नावाचा कर्मचारी स्लॅब कोसळून जखमी झाला होता. एरव्ही, किरकोळ अपघात घडतच असतात.

खासदार राजन विचारे यांनीही ठाणे, नवी मुंबई, भार्इंदरच्या टपाल कार्यालयाबद्दल मुख्य जनरल पोस्टमास्तर एस.सी. अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले होते. भार्इंदरचे टपाल कार्यालय लवकरच सुरक्षित जागेत हलवण्यात येईल, असे त्यावेळी विचारे म्हणाले होते. मनसेच्या महिला पदाधिकारी अनू पाटील यांनी टपाल कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या.

माहिती अधिकारात त्यांना पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी शहरात चार आरक्षणे टपाल कार्यालयासाठी असल्याचे कळवत ती त्या विभागाने ताब्यात घेऊन विकसित केली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.समस्यांबाबत वरिष्ठांना कळवले आहेपोस्टमास्तर एन.आर. खैरनार यांनी सांगितले की, कार्यालयातील अवस्था, अपुरी जागा याबद्दल वरिष्ठांना कळवले आहे. याबाबत समिती काम पाहत असून कार्यालय दुसºया भाड्याच्या जागेत हलवण्यासाठी दोन प्रस्ताव आले आहेत. लवकरच टपाल कार्यालय नवीन प्रशस्त जागेत स्थलांतरित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.