शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:49 IST

कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत. युती जरी असली तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, शिवसेना व भाजपमधील इच्छुकांना युती नको आहे. युतीमुळे त्यांच्या उमेदवारीवर काट मारली जाऊ शकते, अशी भीती इच्छुकांना आहेत. तर विद्यमान आमदारांना युती हवी आहे. त्यात त्यांचा विजय सुकर होणार, अशी राजकीय स्थिती येतील चार विधानसभा मतदारसंघात आहे.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला होता. मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी युतीने कंबर कसली होती. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. त्यामुळे राज्यभरात शिवसेना-भाजप यांनी आपले स्वबळ आजमावले होते. त्यामुळे २०१९ ला लोकसभा निवडणुसाठी युती होणार का, याविषयी कूजबुज होती. मात्र, युती झाली. विधानसभेसाठीही युती राहील, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, विधानसभेची निवडणूक येताच युती जरी असल्याचे सांगण्यात येत असले तरी जागा वाटपावर एकमत झालेले नाही.कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे आहे. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेतूनही अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनाला मिळावा, असा दावा केला आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेतून भाजप पुरस्कृत असलेले अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपतर्फे उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातूनही शिवसेनेकडून काही जण इच्छूक आहेत. कल्याण पूर्व शिवसेनाला सोडावा, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.डोंबिवली मतदारसंघातून राज्यमंत्री व भाजप आ. रवींद्र चव्हाण हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि भाजपच्या दोन जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. डोंबिवलीवर भाजपचा दावा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजप तेथे दावा सांगू शकत नाही. तसेच डोंबिवलीवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. मात्र, कल्याण पूर्व व पश्चिमवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. तेथे भाजपचे आमदारांची नाव पुढे करण्यात आले आहे.ऐनवेळी उमेदवारांची नावे?चारही मतदारसंघांतून शिवसेना व भाजपचे दावेदार प्रबळ आहेत. जागा वाटपावरून युतीचे गणित फिसकटले तरच त्यांना त्यांच्या इच्छुक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते.युती झाल्यावर जे मतदारसंघ शिवसेनेच्या वाटाला येणार नाहीत, त्या मतदारसंघांतून इच्छुक असलेल्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाऊ शकते.दोन्ही पक्षांतील बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला उशिरा जाहीर केला जाऊ शकतो. तसेच अधिकृत उमेदवारांची यादीही ऐनवेळी शेवटच्या क्षणाला २, ३ आणि ४ आॅक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyanकल्याण