शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:49 IST

कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत. युती जरी असली तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, शिवसेना व भाजपमधील इच्छुकांना युती नको आहे. युतीमुळे त्यांच्या उमेदवारीवर काट मारली जाऊ शकते, अशी भीती इच्छुकांना आहेत. तर विद्यमान आमदारांना युती हवी आहे. त्यात त्यांचा विजय सुकर होणार, अशी राजकीय स्थिती येतील चार विधानसभा मतदारसंघात आहे.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला होता. मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी युतीने कंबर कसली होती. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, त्यावेळी शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. त्यामुळे राज्यभरात शिवसेना-भाजप यांनी आपले स्वबळ आजमावले होते. त्यामुळे २०१९ ला लोकसभा निवडणुसाठी युती होणार का, याविषयी कूजबुज होती. मात्र, युती झाली. विधानसभेसाठीही युती राहील, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, विधानसभेची निवडणूक येताच युती जरी असल्याचे सांगण्यात येत असले तरी जागा वाटपावर एकमत झालेले नाही.कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे आहे. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेतूनही अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनाला मिळावा, असा दावा केला आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेतून भाजप पुरस्कृत असलेले अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपतर्फे उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातूनही शिवसेनेकडून काही जण इच्छूक आहेत. कल्याण पूर्व शिवसेनाला सोडावा, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.डोंबिवली मतदारसंघातून राज्यमंत्री व भाजप आ. रवींद्र चव्हाण हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि भाजपच्या दोन जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. डोंबिवलीवर भाजपचा दावा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजप तेथे दावा सांगू शकत नाही. तसेच डोंबिवलीवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. मात्र, कल्याण पूर्व व पश्चिमवर शिवसेना दावा सांगू शकत नाही. तेथे भाजपचे आमदारांची नाव पुढे करण्यात आले आहे.ऐनवेळी उमेदवारांची नावे?चारही मतदारसंघांतून शिवसेना व भाजपचे दावेदार प्रबळ आहेत. जागा वाटपावरून युतीचे गणित फिसकटले तरच त्यांना त्यांच्या इच्छुक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते.युती झाल्यावर जे मतदारसंघ शिवसेनेच्या वाटाला येणार नाहीत, त्या मतदारसंघांतून इच्छुक असलेल्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाऊ शकते.दोन्ही पक्षांतील बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला उशिरा जाहीर केला जाऊ शकतो. तसेच अधिकृत उमेदवारांची यादीही ऐनवेळी शेवटच्या क्षणाला २, ३ आणि ४ आॅक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyanकल्याण