शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भिवंडी बीओटी रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा अंजुरफाटा येथे रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 17:49 IST

या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे.

भिवंडी- भिवंडी ग्रामीण मधील मानकोली खारबाव कामण चिंचोटी, भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी वाडा मनोर या सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. हे रस्ते मृत्यूचा सापळा बनू लागले आहेत. या बाबत अनेक आंदोलने करूनही शासन प्रशासनास जाग येत नसल्याने मनसेतर्फे शनिवारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जधाव व प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथे रास्तारोको निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, मदन पाटील, शिवनाथ भगत, संजय पाटील, भरत पाटील, मनविसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी, शरद नागावकर, मनवि सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांसह अनेक मनसे सैनिक सहभागी झाले होते. (MNS agitation at Anjurphata, Bhiwandi)

गेले वर्षभर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसे तर्फे आंदोलन करण्यात येत असून रास्तारोको, मानवी साखळी, श्राद्ध आंदोलन करूनही या रस्त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने कशेळी व खारबाव मालोडी येथील टोलनाका मनसे कार्यकर्त्यानी फोडला होता. या आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कार्यकारी अभियंता एस एम पाटील, उपअभियंता ज्योती शिंदे यांना निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त करीत, येत्या आठ दिवसात या रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत योग्य ती पावलं सार्वजनिक बांधकाम विभागाने उचलली नाही, तर उग्र आंदोलन करीत ज्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, तेथे गनिमिकाव्याने थडकून जाब विचारला जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. या प्रसंगी या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेनाbhiwandiभिवंडी