शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

भिवंडी बीओटी रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा अंजुरफाटा येथे रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 17:49 IST

या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे.

भिवंडी- भिवंडी ग्रामीण मधील मानकोली खारबाव कामण चिंचोटी, भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी वाडा मनोर या सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. हे रस्ते मृत्यूचा सापळा बनू लागले आहेत. या बाबत अनेक आंदोलने करूनही शासन प्रशासनास जाग येत नसल्याने मनसेतर्फे शनिवारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जधाव व प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथे रास्तारोको निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, मदन पाटील, शिवनाथ भगत, संजय पाटील, भरत पाटील, मनविसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी, शरद नागावकर, मनवि सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांसह अनेक मनसे सैनिक सहभागी झाले होते. (MNS agitation at Anjurphata, Bhiwandi)

गेले वर्षभर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसे तर्फे आंदोलन करण्यात येत असून रास्तारोको, मानवी साखळी, श्राद्ध आंदोलन करूनही या रस्त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने कशेळी व खारबाव मालोडी येथील टोलनाका मनसे कार्यकर्त्यानी फोडला होता. या आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कार्यकारी अभियंता एस एम पाटील, उपअभियंता ज्योती शिंदे यांना निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त करीत, येत्या आठ दिवसात या रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत योग्य ती पावलं सार्वजनिक बांधकाम विभागाने उचलली नाही, तर उग्र आंदोलन करीत ज्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, तेथे गनिमिकाव्याने थडकून जाब विचारला जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. या प्रसंगी या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेनाbhiwandiभिवंडी