शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उल्हास नदीत प्रदूषण एकीकडे, तर नमुने भलतीकडचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:44 IST

माहिती अधिकारातून उघड; प्रदूषण मंडळाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

- मुरलीधर भवार कल्याण : उल्हास नदीच्या पाण्याचा रंग, वास आणि स्थिती पाहूनच तज्ज्ञ नसलेली व्यक्तीही नदी प्रदूषित असल्याचे सांगू शकेल. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याची बाब उल्हास नदी बचाव कृती समितीने माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. मंडळाच्या वेबसाइटवर चुकीची माहिती दिली जात आहे. नदीच्या प्रदूषित भागातील पाण्याचे नमुने न घेता भलत्याच ठिकाणचे नमुने गोळा करून मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात अपिलात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.उल्हास नदी बचाव कृती समितीचे संस्थापकीय सदस्य रवींद्र लिंगायत यांनी प्रदूषण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. २०१७ ते २०१९ या कालावधीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषणाच्या ठिकाणचे किती पाण्याचे नमुने गोळा केले? त्यांचा अहवाल काय आला? याच्या साक्षांकित प्रतींसह माहिती दिली जावी, असे म्हटले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा प्रकारच्या साक्षांकित प्रती त्यांच्याकडे उपलब्ध नसून यासंदर्भातील माहिती त्यात्या वेळी आॅनलाइनवर प्रसिद्ध केली आहे.नदी प्रदूषित असलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रोटोकॉल, रिझल्टशीट आणि व्हिजिट नोट या स्वरूपात ही माहिती उपलब्ध असणे आवश्यकआहे. मात्र, अशी माहितीच प्रदूषण मंडळाकडे उपलब्ध नसल्याने ती लिंगायत यांना देण्यात आली नाही. मंडळाने आॅनलाइनवर उपलब्ध केलेल्या पाण्याचे नमुने घेतलेल्या ठिकाणांचे रेखांश आणि अक्षांश नमूद केले आहेत. त्यात ताळमेळ नसून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मागदर्शक तत्त्वांनुसार ते गोळा केले जात नाहीत.प्रदूषित ठिकाणचे नमुने न घेता पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणचे नमुने घेतले जातात. प्रदूषित ठिकाणच्या वरच्या आणि खालच्या बाजूला नदीतील दोन्ही ठिकाणचे नमुने गोळा करणे अपेक्षित आहे. ही ठिकाणेच मंडळाकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेली आहेत. कल्याण-भिवंडी पूल, जांभूळ, बदलापूर, एनआरसी याच ठिकाणी नमुने घेतले जातात. कचरा, सांडपाणी, कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी सोडले जाते, अशी ठिकाणे कर्जतपासून कल्याणपर्यंत अनेक आहेत. योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी प्रदूषित पाण्याचे नमुनेच घेतले जात नसतील, तर नदी प्रदूषणाचा अहवाल योग्य कसा काय येणार, याविषयी नदी बचाव कृती समितीचे संस्थापकीय सदस्य अश्वीन भोईर व विवेक गंभीरराव यांनी उपस्थित केला आहे....तर अधिकाऱ्यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या भेट देणारनदी बचाव कृती समितीने नुकताच नदीच्या उगमस्थानापासून नदीचा दोन दिवसांचा अभ्यास दौरा केला होता. या दौºयात नदी प्रदूषित होते, त्याठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.त्याचा अहवाल आठ दिवसांत समितीच्या हाती येणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी मंडळाकडून केला जाणारा मनमानी कारभार माहिती अधिकारात समितीचे संस्थापकीय सदस्य लिंगायत यांनी उघड केला आहे.याप्रकरणी लिंगायत मंडळाकडे अपिलात जाणार आहेत. मंडळाच्या कामात सुधारणा दिसून आली नाही, तर अधिकाऱ्यांसह त्यांच्या घरच्यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या जातील, असा इशाराच समितीच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.