शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

उल्हास नदीत प्रदूषण एकीकडे, तर नमुने भलतीकडचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:44 IST

माहिती अधिकारातून उघड; प्रदूषण मंडळाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

- मुरलीधर भवार कल्याण : उल्हास नदीच्या पाण्याचा रंग, वास आणि स्थिती पाहूनच तज्ज्ञ नसलेली व्यक्तीही नदी प्रदूषित असल्याचे सांगू शकेल. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याची बाब उल्हास नदी बचाव कृती समितीने माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. मंडळाच्या वेबसाइटवर चुकीची माहिती दिली जात आहे. नदीच्या प्रदूषित भागातील पाण्याचे नमुने न घेता भलत्याच ठिकाणचे नमुने गोळा करून मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात अपिलात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.उल्हास नदी बचाव कृती समितीचे संस्थापकीय सदस्य रवींद्र लिंगायत यांनी प्रदूषण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. २०१७ ते २०१९ या कालावधीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषणाच्या ठिकाणचे किती पाण्याचे नमुने गोळा केले? त्यांचा अहवाल काय आला? याच्या साक्षांकित प्रतींसह माहिती दिली जावी, असे म्हटले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा प्रकारच्या साक्षांकित प्रती त्यांच्याकडे उपलब्ध नसून यासंदर्भातील माहिती त्यात्या वेळी आॅनलाइनवर प्रसिद्ध केली आहे.नदी प्रदूषित असलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रोटोकॉल, रिझल्टशीट आणि व्हिजिट नोट या स्वरूपात ही माहिती उपलब्ध असणे आवश्यकआहे. मात्र, अशी माहितीच प्रदूषण मंडळाकडे उपलब्ध नसल्याने ती लिंगायत यांना देण्यात आली नाही. मंडळाने आॅनलाइनवर उपलब्ध केलेल्या पाण्याचे नमुने घेतलेल्या ठिकाणांचे रेखांश आणि अक्षांश नमूद केले आहेत. त्यात ताळमेळ नसून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मागदर्शक तत्त्वांनुसार ते गोळा केले जात नाहीत.प्रदूषित ठिकाणचे नमुने न घेता पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणचे नमुने घेतले जातात. प्रदूषित ठिकाणच्या वरच्या आणि खालच्या बाजूला नदीतील दोन्ही ठिकाणचे नमुने गोळा करणे अपेक्षित आहे. ही ठिकाणेच मंडळाकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेली आहेत. कल्याण-भिवंडी पूल, जांभूळ, बदलापूर, एनआरसी याच ठिकाणी नमुने घेतले जातात. कचरा, सांडपाणी, कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी सोडले जाते, अशी ठिकाणे कर्जतपासून कल्याणपर्यंत अनेक आहेत. योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी प्रदूषित पाण्याचे नमुनेच घेतले जात नसतील, तर नदी प्रदूषणाचा अहवाल योग्य कसा काय येणार, याविषयी नदी बचाव कृती समितीचे संस्थापकीय सदस्य अश्वीन भोईर व विवेक गंभीरराव यांनी उपस्थित केला आहे....तर अधिकाऱ्यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या भेट देणारनदी बचाव कृती समितीने नुकताच नदीच्या उगमस्थानापासून नदीचा दोन दिवसांचा अभ्यास दौरा केला होता. या दौºयात नदी प्रदूषित होते, त्याठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.त्याचा अहवाल आठ दिवसांत समितीच्या हाती येणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी मंडळाकडून केला जाणारा मनमानी कारभार माहिती अधिकारात समितीचे संस्थापकीय सदस्य लिंगायत यांनी उघड केला आहे.याप्रकरणी लिंगायत मंडळाकडे अपिलात जाणार आहेत. मंडळाच्या कामात सुधारणा दिसून आली नाही, तर अधिकाऱ्यांसह त्यांच्या घरच्यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या जातील, असा इशाराच समितीच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.