शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या प्रचाररॅलीत ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 23:54 IST

आयोग, पोलिसांचे दुर्लक्ष : लाउडस्पीकरवर घोषणा, प्रचारगीते

ठाणे : निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला असून प्रत्येक उमेदवार आपली प्रचारफेरी आपापल्या मतदारसंघातून काढत असताना लाउडस्पीकरवर घोषणाबाजी करीत आहे, प्रचाराची गाणी वाजवत आहे. हे कमी म्हणून की काय, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येऊ नये, याकरिता बेन्जो वाजवला जात आहे. यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे निवडणूक आयोग व पोलिसांनी चक्क कानाडोळा केला असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी ठाण्यातील दक्ष नागरिकांनी केल्या आहेत.

सध्या परीक्षांचे दिवस सुरू असून शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी अभ्यास करीत असताना वरचेवर उमेदवारांच्या वेगवेगळ्या भागातील प्रचारयात्रांनी त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना वाजतगाजत मिरवणुका काढल्या व दणदणाट केला. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा प्रचाराचा जोर वाढला. शनिवारी दुपारी प्रचार संपत असल्यामुळे शेवटच्या दोनचार दिवसांपासून उमेदवारांची मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. उमेदवारांच्या दिवसा व सायंकाळी निघणाºया प्रचाररॅलीतून होणाºया ध्वनिप्रदूषणामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत.

याखेरीज, काही भागात जाहीर सभांचे आयोजन केले असून त्याकरिता घोषणा देत येणारे कार्यकर्ते व सभेपूर्वी लावली जाणारी प्रचारगीते यामुळे आजूबाजूच्या वृद्ध, विद्यार्थी तसेच रुग्णांना त्रास होत आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत राजकीय पक्ष जागरूक तर नाहीच, परंतु पोलीस आणि निवडणूक आयोगही दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. एरव्ही गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, गुढीपाडव्यातील ढोलताशांमुळे होणाºया ध्वनिप्रदूषणाबाबत ओरड करणारे पर्यावरणवादीही या प्रचाररॅलीतून होणाºया ध्वनिप्रदूषणाकडे फारसे लक्ष देत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषणाचे नियम सण-उत्सवाबरोबर निवडणुकीच्या प्रचारालाही लागू होतात. परंतु, निवडणूक काळातच हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.ध्वनिमर्यादा ही सगळीकडे सारखीच लागू असते, अगदी निवडणुकीच्या प्रचारालाही. डब्ल्यूएचओनुसार आवाजाचे डेसिबल्सचे मापदंड ठरले आहेत. रहिवासी परिसर, रुग्णालय परिसर, औद्योगिक क्षेत्र आणि शांतता क्षेत्र या ठिकाणचे डेसिबलचे मापदंड ठरलेले आहेत. तो मापदंड कोणत्याही दिवशी बदलत नाही. निवडणूक असो वा नसो, निवडणूक काळात आवाजाच्या मर्यादा बदला, असे होत नाही. आवाज कमीच ठेवला पाहिजे. वर्षातून १५ दिवस १० ते १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर लावण्यास परवानगी आहे. परंतु, ते १५ दिवस हे सण-उत्सवांचे असतात. तेव्हा मंजूर मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल्स वाढवू शकत नाही. निवडणूक काळात व निकाल लागल्यानंतर उमेदवारांकडून जिंकल्यावर गोंधळ घालून वायू आणि ध्वनिप्रदूषण केले जाऊ नये, याची काळजी उमेदवारांनी स्वत:च घ्यावी.

- डॉ. महेश बेडेकर, पर्यावरण अभ्यासक