शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

परप्रांतीयांकडून तलावाचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:21 IST

मनविसेचा आरोप : भार्इंदर पालिकेकडे केली तक्रार, जलचरांना निर्माण झाला धोका

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिमीरा परिसरातील काशिगाव येथे बांधलेल्या जरीमरी तलावाचा परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे तलावातील जलचरांना धोका निर्माण होणार असल्याने प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) शहर सचिव शान पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे.पालिकेने १० वर्षापूर्वी काशिगाव येथील तलावाच्या भोवताली उद्यान बांधून तलावाला सुरक्षित केले. या तलावाचे पाणी शहरातील दुभाजक व पदपथाजवळच्या झाडांना दिले जाते. या तलावात मोठ्या संख्येने मासे असून या तलावाच्या सभोवताली बांधलेल्या उद्यानामुळे काशिगाव परिसराची शोभा वाढली आहे. मात्र या तलावात येथील काही परप्रांतीय बिनधास्त आंघोळ करून तेथेच कपडे धुतात. तर काही महाभाग या तलावातील पाण्याने आपापली वाहनेही धूत असल्याने तलावातील पाण्याची पातळी खालावून त्याच्या गैरवापरामुळे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे.या तलावात गणपती, गौरी व नवरात्रीतील देवींच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे त्यात प्रदूषणाची पातळी वाढत असली तरी परप्रांतीयांच्या गैरवापरामुळे त्यात भर पडत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने हा गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रदूषणामुळे भार्इंदर पश्चिमेकडील मांदली प्रभाग समिती ३ येथील तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडतात.यंदा त्यात जरीमरी तलावाची भर पडणार असल्याचा दावा करत मनविसेने तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणाºयांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.मनविसेचा आंदोलनाचा इशारातलावातील पाण्याचा गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावा, अशी मागणी पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना पत्रव्यवहार करीत जरीमरी तलावासाठी त्वरित सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. त्यावर उपायुक्तांनी आस्थापना विभागाला निर्देश दिले असले तरी तलावातील पाण्याच्या गैरवापराला अद्याप आळा न घातल्याने त्याचे प्रदूषण अद्याप सुरुच असल्याचा दावा करत पवार यांनी प्रशासनाने हा प्रकार न थांबवल्यास आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :MNSमनसे