शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांकडून तलावाचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:21 IST

मनविसेचा आरोप : भार्इंदर पालिकेकडे केली तक्रार, जलचरांना निर्माण झाला धोका

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिमीरा परिसरातील काशिगाव येथे बांधलेल्या जरीमरी तलावाचा परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे तलावातील जलचरांना धोका निर्माण होणार असल्याने प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) शहर सचिव शान पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे.पालिकेने १० वर्षापूर्वी काशिगाव येथील तलावाच्या भोवताली उद्यान बांधून तलावाला सुरक्षित केले. या तलावाचे पाणी शहरातील दुभाजक व पदपथाजवळच्या झाडांना दिले जाते. या तलावात मोठ्या संख्येने मासे असून या तलावाच्या सभोवताली बांधलेल्या उद्यानामुळे काशिगाव परिसराची शोभा वाढली आहे. मात्र या तलावात येथील काही परप्रांतीय बिनधास्त आंघोळ करून तेथेच कपडे धुतात. तर काही महाभाग या तलावातील पाण्याने आपापली वाहनेही धूत असल्याने तलावातील पाण्याची पातळी खालावून त्याच्या गैरवापरामुळे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे.या तलावात गणपती, गौरी व नवरात्रीतील देवींच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे त्यात प्रदूषणाची पातळी वाढत असली तरी परप्रांतीयांच्या गैरवापरामुळे त्यात भर पडत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने हा गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रदूषणामुळे भार्इंदर पश्चिमेकडील मांदली प्रभाग समिती ३ येथील तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडतात.यंदा त्यात जरीमरी तलावाची भर पडणार असल्याचा दावा करत मनविसेने तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणाºयांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.मनविसेचा आंदोलनाचा इशारातलावातील पाण्याचा गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावा, अशी मागणी पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना पत्रव्यवहार करीत जरीमरी तलावासाठी त्वरित सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. त्यावर उपायुक्तांनी आस्थापना विभागाला निर्देश दिले असले तरी तलावातील पाण्याच्या गैरवापराला अद्याप आळा न घातल्याने त्याचे प्रदूषण अद्याप सुरुच असल्याचा दावा करत पवार यांनी प्रशासनाने हा प्रकार न थांबवल्यास आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :MNSमनसे