शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स कारखान्यांना प्रदूषण मंडळाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:17 IST

उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांवर कारवाई झाल्यावर या ठिकाणी असलेले जीन्स उद्योग जवळील शहरात आसरा घेत आहेत. अंबरनाथमधील बुवापाडा भागात नव्याने सुरू केलेल्या जीन्स कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. तर पालिका प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

अंबरनाथ : उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांवर कारवाई झाल्यावर या ठिकाणी असलेले जीन्स उद्योग जवळील शहरात आसरा घेत आहेत. अंबरनाथमधील बुवापाडा भागात नव्याने सुरू केलेल्या जीन्स कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. तर पालिका प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करणार आहे.वालधुनी नदीच्या प्रदूषणाच्या मुद्यावर उल्हासनगर महापालिकेने शहरातील सर्व जीन्स कारखान्यांवर कारवाई केली. जीन्स वॉश करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिल्याने आता या ठिकाणी असलेले उद्योग अन्यत्र स्थलांतरीत होत आहेत. त्यातील काही उद्योग हे बुवापाडा भागात आले आहेत. त्यांनी या भागात जीन्स वॉश करण्याचा कारखाना देखील उभारला आहे. या जीन्स कारखान्यांवरून कारखानदार आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वादही झाले होते. मात्र तरीही कारखाने सुरूच राहिले आहेत.बुवापाडाप्रमाणेच महेंद्र नगर, खामकरवाडी या भागातही असे कारखाने सुरू करण्यात आले. या सर्व जीन्स कारखान्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र स्थानिक पालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्यांना नोटीस बजावली आहे. तसेच त्यांचे वीज आणि पाणी जोजणी तोडण्यासाठी पत्र दिले आहे. तर दुसरीकडे अंबरनाथ पालिकेनेही त्यांच्या स्तरावर या संदर्भात कारवाई सुरू केली आहे. कारखाने बंद न केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.उल्हासनगमधून अनेक जीन्स उद्योग हे अंबरनाथ शहर आणि ग्रामीण भागात स्थिरावले आहेत.नागरिकांनी व्यक्त केले समाधानप्रदूषण मंडळाकडून किमान या उद्योगांची पाहणी करून त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हे उद्योग बंदच झाले पाहिजे अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे. या उद्योगासाठी स्थानिकांनी भाडेतत्वावर जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. तर वॉश केलेले जीन्स सुकण्यासाठी खुल्या जागेवर टाकू नये असे आवाहन नागरिक करत आहेत.