शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:55 IST

लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राजकारण बेसूर झाले आहे. मात्र, देशाची शान गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे.  ही ठाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्वश्रेष्ठ लतायुग आपण अनुभवले.  त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी गुरुकुलसारख्या संस्था  उपयुक्त  ठरतील,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. नागरिकांच्या पाणीप्रश्नाबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे पालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या याेजनेंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाच्या  (गुरुकुल)  कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ.  काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रिमोटच्या माध्यमातून पार पडले. यावेळी  लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा ज्येष्ठ गायिका  उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक, कृष्णा मंगेशकर, पालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी नगरसेविका परिषा सरनाईक आदींसह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यालयासाठी सरकारकडून २५ कोटी n शिंदे म्हणाले, विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी दिले आहेत. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळाराम ठाण्यातील. ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून गायक आणि संगीतकार घडतील. या उपक्रमाला  सरकारच्या वतीने पाठबळ देऊ. n ठाण्यात पूर्वी विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. परंतु, त्या प्रदूषित झाल्या आहेत. ज्या विहिरींनी आपली तहान भागवली, त्या विहिरींना विसरू शकत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपली संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ५० कोटींच्या निधीतून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले जाणार आहे. ठाणेकरांमुळे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याचे रस्ते देखील धुण्याचे आदेश महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

क्लस्टरमुळे मिळणार हक्काची घरेआ. प्रताप सरनाईक यांनी संगीत विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांनी घेण्याची विनंती केली. ती स्वीकारून उषा मंगेशकर यांनी आभार व्यक्त केले. बदलते ठाणे पाहून, उषा मंगेशकर यांनी मुंबईतही चांगले रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चांगले रस्ते करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

बोल तेरे साथ क्या सुलूक...लता मंगेशकर यांच्या ‘मार दिया जाय, या छोड दिया जाय...’ या गाण्याची आठवण करीत आपण मात्र सर्व सोडून काम करीत असतो. खूप गमावलंय, पण जनतेचे प्रेम मात्र कमावलंय, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राजकारण बेसूर झाले असून काही कावळ्यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणही वाढल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे