शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:55 IST

लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राजकारण बेसूर झाले आहे. मात्र, देशाची शान गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे.  ही ठाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्वश्रेष्ठ लतायुग आपण अनुभवले.  त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी गुरुकुलसारख्या संस्था  उपयुक्त  ठरतील,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. नागरिकांच्या पाणीप्रश्नाबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे पालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या याेजनेंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाच्या  (गुरुकुल)  कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ.  काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रिमोटच्या माध्यमातून पार पडले. यावेळी  लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा ज्येष्ठ गायिका  उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक, कृष्णा मंगेशकर, पालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी नगरसेविका परिषा सरनाईक आदींसह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यालयासाठी सरकारकडून २५ कोटी n शिंदे म्हणाले, विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी दिले आहेत. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळाराम ठाण्यातील. ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून गायक आणि संगीतकार घडतील. या उपक्रमाला  सरकारच्या वतीने पाठबळ देऊ. n ठाण्यात पूर्वी विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. परंतु, त्या प्रदूषित झाल्या आहेत. ज्या विहिरींनी आपली तहान भागवली, त्या विहिरींना विसरू शकत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपली संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ५० कोटींच्या निधीतून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले जाणार आहे. ठाणेकरांमुळे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याचे रस्ते देखील धुण्याचे आदेश महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

क्लस्टरमुळे मिळणार हक्काची घरेआ. प्रताप सरनाईक यांनी संगीत विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांनी घेण्याची विनंती केली. ती स्वीकारून उषा मंगेशकर यांनी आभार व्यक्त केले. बदलते ठाणे पाहून, उषा मंगेशकर यांनी मुंबईतही चांगले रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चांगले रस्ते करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

बोल तेरे साथ क्या सुलूक...लता मंगेशकर यांच्या ‘मार दिया जाय, या छोड दिया जाय...’ या गाण्याची आठवण करीत आपण मात्र सर्व सोडून काम करीत असतो. खूप गमावलंय, पण जनतेचे प्रेम मात्र कमावलंय, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राजकारण बेसूर झाले असून काही कावळ्यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणही वाढल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे