शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:55 IST

लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राजकारण बेसूर झाले आहे. मात्र, देशाची शान गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे.  ही ठाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्वश्रेष्ठ लतायुग आपण अनुभवले.  त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी गुरुकुलसारख्या संस्था  उपयुक्त  ठरतील,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. नागरिकांच्या पाणीप्रश्नाबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे पालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या याेजनेंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाच्या  (गुरुकुल)  कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ.  काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रिमोटच्या माध्यमातून पार पडले. यावेळी  लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा ज्येष्ठ गायिका  उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक, कृष्णा मंगेशकर, पालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी नगरसेविका परिषा सरनाईक आदींसह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यालयासाठी सरकारकडून २५ कोटी n शिंदे म्हणाले, विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी दिले आहेत. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळाराम ठाण्यातील. ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून गायक आणि संगीतकार घडतील. या उपक्रमाला  सरकारच्या वतीने पाठबळ देऊ. n ठाण्यात पूर्वी विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. परंतु, त्या प्रदूषित झाल्या आहेत. ज्या विहिरींनी आपली तहान भागवली, त्या विहिरींना विसरू शकत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपली संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ५० कोटींच्या निधीतून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले जाणार आहे. ठाणेकरांमुळे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याचे रस्ते देखील धुण्याचे आदेश महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

क्लस्टरमुळे मिळणार हक्काची घरेआ. प्रताप सरनाईक यांनी संगीत विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांनी घेण्याची विनंती केली. ती स्वीकारून उषा मंगेशकर यांनी आभार व्यक्त केले. बदलते ठाणे पाहून, उषा मंगेशकर यांनी मुंबईतही चांगले रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चांगले रस्ते करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

बोल तेरे साथ क्या सुलूक...लता मंगेशकर यांच्या ‘मार दिया जाय, या छोड दिया जाय...’ या गाण्याची आठवण करीत आपण मात्र सर्व सोडून काम करीत असतो. खूप गमावलंय, पण जनतेचे प्रेम मात्र कमावलंय, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राजकारण बेसूर झाले असून काही कावळ्यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणही वाढल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे