शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय फटाके फुटणार :बंदीवरून पेटले राजकारण,शिवसेना-मनसेला रिपाइंने दिले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:17 IST

ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे.

ठाणे : ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे. दहीहंडी, दिवाळी अशा हिंदूंच्या सणांच्यावेळी निर्बंध आणले जाणार असतील, तर ते सहन केले जाणार नाही, असा पवित्रा या पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. मात्र, त्याचवेळी रस्त्यावर एक जरी फटाक्याचे दुकान दिसले, तरी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने दिला आहे. या राजकीय पक्षांनी आपापले इशारे खरे केले, तर ठाण्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवसेना आणि मनसेने त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर गुरु वारी ठाणे रिपाइंने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एकाही फटाक्याचे दुकान रस्त्यावर लावू देणार नाही, असा इशारा दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही निवासी भागात फटाके न उडवण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यात रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी करण्याचे आदेश अग्निशमन दलाने जारी केले. त्यामुळे फटाकेविक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने फटाकेविक्रेत्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर रिपाइं (आठवले) ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीCrackersफटाकेthaneठाणे