शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

मुजोर फेरीवाल्यांना राजकीय, प्रशासकीय वरदहस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये महापालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दगडफेक करण्यापर्यंतचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, हप्तेबाजी व अर्थपूर्ण ...

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये महापालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दगडफेक करण्यापर्यंतचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, हप्तेबाजी व अर्थपूर्ण कारणांमुळे राजकारणी आणि प्रशासनाची माया सुटत नसल्याने फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे शहरच फेरीवाल्यांच्या विळख्यात आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील मुख्य रस्ते, चौक हे ना फेरीवाला झोन म्हणून जाहीर केले आहेत. शिवाय, न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, रुग्णालय व धार्मिक स्थळांपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसरात हातगाड्या-फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केलेली आहे. तर काही फेरीवाल्यांना पालिकेने पट्टे आखून दिलेले आहे. मात्र, हे केवळ कागद आणि फलकांपुरते मर्यादित राहिले आहे. सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी फेरीवाल्यांच्या गराड्यातून मार्ग काढणे जिकिरीचे बनले आहे. वाहतुकीची कोंडीही प्रचंड होते. फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने लोकांना रस्त्यातून जीव मुठीत धरून चालावे लागते. फेरीवाल्यांमुळे प्लास्टिक व अन्य कचरा जास्त प्रमाणात निर्माण होतो व ते तसाच टाकून जातात. ध्वनी व वायुप्रदूषण वाढत आहे.

सार्वजनिक रस्ते, पदपथ आदी मोक्याच्या जागा बळकावून बसायच्या आणि माज दाखवून लोकांना वेठीस धरून उपद्रव करायचा, असा हा आतबट्ट्याचा कारभार सुरू आहे. राजरोस फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत असूनही पालिका प्रशासनासह नगरसेवक-राजकारणी चिडीचूप असतात. दिखाव्यापुरती तक्रार व कारवाई केली जाते. भाजप व महापालिका प्रशासनाने नाल्यांवरही मंडई केल्या. मंडईमधील गाळेवाटपावरून गैरप्रकारांचे आरोप होत आहेत. पुन्हा फेरीवाले व हातगाड्यांनी परिसरातील रस्ते-पदपथ गिळंकृत केले आहेत. हप्तेवसुलीमुळे फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. हातगाड्या भाड्याने देणारे रॅकेट वेगळेच आहे. त्यामुळे तक्रारींनंतरही बेकायदा फेरीवाल्यांवर ठोस कारवाईच हाेत नाही. राजकारणी-नगरसेवकही त्यांच्या भागातील वाढत्या फेरीवाल्यांना रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत नाहीत.

शहरात फेरीवाल्यांचे अनेक हल्ले

मीरा रोडच्या जांगीड सर्कल ते बालाजी हॉटेल मुख्य मार्गावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून जप्त साहित्य नेत असताना ५० ते ६० फेरीवाल्यांनी दगडफेक करत दांडे घेऊन हल्ला चढवला होता. जमावाच्या हल्ल्यातून अधिकारी-कर्मचारी बचावले हाेते. मीरा रोडच्या शांतीनगर व रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनीही पालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांना दगडफेक, धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले होते. भाईंदरच्या दीपक रुग्णालय गल्ली, नवघर मार्ग, शिवसेना गल्लीतही फेरीवाल्यांची मुजाेरी चालते.