शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

बालकामगारांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

By admin | Updated: February 5, 2016 02:35 IST

हरवलेल्या बालकांचा शोध घेतानाच बाल कामगारविरोधात हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातून २५ बाल कामगारांची सुटका करण्यात आली.

शशी करपे,  वसईहरवलेल्या बालकांचा शोध घेतानाच बाल कामगारविरोधात हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातून २५ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. यावेळी चौदा जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून प्रत्येक वीस हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. तर पालघर जिल्ह्यातून महिन्याभरात तब्बल १७८ बालकांचा शोध घेऊन त्यापैकी १५३ बालकांना पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना बाल गृहात पाठवून त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे.पालघर जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पालघर जिल्हा पोलीस, वुमन ट्रॅफिकिंंग सेल, रेल्वे पोलिसांच्या मदतीने आॅपरेशन स्माईल-२ अभियान हाती घेतले असून जानेवारी महिन्यात केलेल्या धडक कारवाईत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातील दुकानांमध्ये काम करणाऱ्या २५ बालकांची सुटका केली. यावेळी चौदा दुकानदारांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची कारवाई केली.या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणांहून १७८ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. यातील १५३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. उर्वरित २५ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील बालगृहात ठेवण्यात आले असून त्यांची पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यातील पालघर जिल्ह्यातील अपवाद वगळता बरीचशी बालके नेपाळ, बिहार, राजस्थान. उत्तरप्रदेश आदी राज्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संदीप लांजेवार यांनी दिली. येथील व्यावसायिक अल्प पगारात दिवस-रात्र काम करणारे मजूर म्हणून त्यांना अधिक पसंती देतात.दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक राजेश प्रधान यांनीही आॅपरेश स्माईल अंतर्गत जिल्ह्यातील बेपत्ता आणि हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. यासंदर्भात अधिक शोध सुरु आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत १ जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१५ (आॅगस्ट २०१४ पर्यंत यात पालघर जिल्ह्याचा समावेश होता) पर्यंत १ हजार ३१ मुली हरवल्याची नोंद होती. यातील १ हजार १५ मुली सापडल्या होत्या तर १६ मुली बेपत्ता होत्या. तसेच ६६१ मुले बेपत्ता झाल्याची नोंदी होत्या. त्यापैकी ६३५ मुले सापडली होती. तर २६ मुले बेपत्ता होती.