शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पंतप्रधान रोजगार कार्यक्रम रखडला, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:12 IST

महामंडळाकडून येणारी कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत आहे.

ठाणे : महामंडळाकडून येणारी कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत आहे. शिवाय, पंतप्रधान रोजगार कार्यक्रम रखडला असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील बँकांच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे संबंधितांनी बुधवारी केल्या.या आढावा बैठकीत शेतकºयांच्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्जपुरवठा आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, माविम, श्यामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घकाळासाठी प्रलंबित राहतात, अशा तक्रारी केल्या. महिला बचत गटांची खाती लवकर उघडण्यात येत नाहीत. यामुळे त्यांच्या कर्जपुरवठ्यासह संभाव्य विकासावरही परिणाम होतो, असे माविम प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक व्ही.बी. सोने यांनी त्यांच्याकडील पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्रामोद्योग यामधील उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. बँकांनी त्यांच्याकडे प्रकरणे गेल्यानंतर त्यावर तातडीने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. प्रलंबित ठेवल्यास विपरित परिणाम होतो, असे सोने यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप आतापर्यंत झाले असून ते वाढवण्याची गरज आहे. बँकांनी यासाठी तालुकानिहाय मेळावे घ्यावे, अशी सूचना जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केली.