शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

धोकादायक इमारत कोसळल्यास वित्त व जीवितहानीला प्लॉटधारक जबाबदार, महापालिकेने झटकले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 14:56 IST

उल्हासनगरात एकून १४७ धोकादायक इमारती, त्यापैकी २३ अतिधोकादायक इमारती

ठळक मुद्देशहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेने एकून १४७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या. त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक तर ८ दुरुस्ती योग्य असल्याचे सांगितले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : मोहिनी पॅलेस इमारतीच्या दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने १४७ धोकादायक इमारती घोषित केल्या. त्यापैकी २३ अतिधोकादायक इमारती आहेत. महापालिकेने स्वतःची जबाबदारी झटकत इमारती मध्ये वास्तव करीत असलेल्या नागरिकांनी इमारत खाली करण्याचे आवाहन केले. जीवित व वित्तहानीला महापालिकेने स्वतःला नव्हेतर प्लॉटधारकांना जबाबदार धरले. 

उल्हासनगरात गेल्या ११ वर्षात शिशमहल, भगवंती, नीलकंठ, शिवसागर, राणी माँ, महालक्ष्मी, शांती पॅलेस, सन्मुख सदन, गुडमन कॉटेज असा ३६ इमारतीचे स्लॅब कोसळून ३० पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले. यातील बहुतांश इमारती सन १९९२ ते ९६ दरम्यान बांधण्यात आल्या असून त्यावेळी रेती उपसावर बंदी असल्याने इमारत बांधकामासाठी दगडाचा बारीक चुरा, उलावा रेतीचा वापर करण्यात आला. यातील बहुतांश इमारती अवैध असून वाढीव छटईक्षेत्राचा वापर करण्यात आला. तत्कालीन महापालिका अधिकारी, राजकीय नेते, नगरसेवक या बांधकामांना जबाबदार असल्याची टीका होत आहे. सन २००६ साली शहरातील अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी खास शहरासाठी विशेष अध्यादेश काढला. मात्र त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही.

शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेने एकून १४७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या. त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक तर ८ दुरुस्ती योग्य असल्याचे सांगितले. धोकादायक इमारती मध्ये शेकडो नागरीक जीव मुठीत धरून राहत असून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी प्लॉटधारकांनी इमारती मधील वास्तव्य हलविण्याचे आवाहन केले. इमारत कोसळून वित्त व जीवितहानी झाल्यास त्याला स्वतः प्लॉटधारक जबाबदार असल्याचे सांगितली. एकूणच महापालिकेने स्वतःची जबाबदारी झटकल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे सर्रासपणे बहुमजली अवैध बांधकामे होऊन कारवाई होत नसल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. 

दुर्घटनाग्रस्त इमारतीतील नागरिक भाडेतत्वावर? 

शहरात गेल्या ११ वर्षात ३३ पेक्षा जास्त इमारती पडल्या असून ३० पेक्षा जास्त नागरिकांनाचा मृत्यू झाला. इमारती मधील बेघर झालेले शेकडो नागरिक आजही jयाभाडेतत्वावर राहत आहे. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीच्या मागणीने जोर धरला आहे. शासनाने इमारतीला वाढीव चटईक्षेत्र देऊन पुनर्बांधणी साठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर