शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

निविदांचा खेळ चाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:41 IST

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला.

कल्याण : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. त्यामुळे ती उघडलेली नाही. आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. यावेळी एक कंपनी जरी आली, तरी तिच्याशी वाटाघाटी करून तिला प्रकल्पाचे काम देण्याचा मानस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे. मार्चपासून प्रकल्पाच्या निविदेचा खेळ सुरू असल्याने तिसरा प्रयत्न तरी यशस्वी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.कचºयापासून वीजनिर्मितीसाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे आग्रही होते. १८ मार्च २०१८ ला या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, निविदापूर्व बैठकीत ट्रान्सपरंट टीएकएनएम मलेशिया, जिंदाल अर्बन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया पॉवर लिमिटेड, खागा एनर्जी, ग्रीन लॉजिक्स, स्टेफिल नेक्डलॅण्ड, बायो क्लीन सिस्टीम, डेक्कन माइन, इन्फिनिटी या कंपन्यांनी कल्याणमध्ये कचºयापासून वीजनिर्मितीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महापालिका या प्रकल्पासाठी उंबर्डे येथे जागा देणार होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका हद्दीतील ५०० मेट्रीक टन घनकचºयावर प्रक्रिया करून त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या मान्यतेने महावितरण कंपनीस दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी केडीएमसीकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळणार नाही. त्यामुळे प्रतियुनिट ५.५० रुपयांनी वीजखरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. काही अटीशर्तीमुळे एकाही कंपनीने निविदा भरली नाही. त्यामुळे निविदेची पहिला फेरी वाया गेली. महापालिकेने दुसºयांदा निविदा मागवली. ही निविदा मागवताना काही अटीशर्ती शिथिल केल्या, तरीही त्याला एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आणखी एक महिना जाणार आहे.नेदरलॅण्डशी सामंजस्य करारवेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रस्तावित असताना राज्य सरकारने नेदरलॅण्ड सरकारशी पाणी, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत नागरी नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन तयार व्हावा, याकरिता सामंजस्य करार २३ मे रोजी केला आहे. या कराराची बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झाली. कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, ठाणे, पिंपरी-चिंडवड, नागपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. त्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. नेदरलॅण्डमधील अ‍ॅमस्टरडॅम या शहरात वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प प्रभावीपणे सुरू आहे. त्याची मदत राज्यातील महापालिकांना होणार आहे.