शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

निविदांचा खेळ चाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:41 IST

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला.

कल्याण : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. त्यामुळे ती उघडलेली नाही. आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. यावेळी एक कंपनी जरी आली, तरी तिच्याशी वाटाघाटी करून तिला प्रकल्पाचे काम देण्याचा मानस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे. मार्चपासून प्रकल्पाच्या निविदेचा खेळ सुरू असल्याने तिसरा प्रयत्न तरी यशस्वी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.कचºयापासून वीजनिर्मितीसाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे आग्रही होते. १८ मार्च २०१८ ला या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, निविदापूर्व बैठकीत ट्रान्सपरंट टीएकएनएम मलेशिया, जिंदाल अर्बन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया पॉवर लिमिटेड, खागा एनर्जी, ग्रीन लॉजिक्स, स्टेफिल नेक्डलॅण्ड, बायो क्लीन सिस्टीम, डेक्कन माइन, इन्फिनिटी या कंपन्यांनी कल्याणमध्ये कचºयापासून वीजनिर्मितीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महापालिका या प्रकल्पासाठी उंबर्डे येथे जागा देणार होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका हद्दीतील ५०० मेट्रीक टन घनकचºयावर प्रक्रिया करून त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या मान्यतेने महावितरण कंपनीस दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी केडीएमसीकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळणार नाही. त्यामुळे प्रतियुनिट ५.५० रुपयांनी वीजखरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. काही अटीशर्तीमुळे एकाही कंपनीने निविदा भरली नाही. त्यामुळे निविदेची पहिला फेरी वाया गेली. महापालिकेने दुसºयांदा निविदा मागवली. ही निविदा मागवताना काही अटीशर्ती शिथिल केल्या, तरीही त्याला एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आणखी एक महिना जाणार आहे.नेदरलॅण्डशी सामंजस्य करारवेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रस्तावित असताना राज्य सरकारने नेदरलॅण्ड सरकारशी पाणी, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत नागरी नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन तयार व्हावा, याकरिता सामंजस्य करार २३ मे रोजी केला आहे. या कराराची बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झाली. कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, ठाणे, पिंपरी-चिंडवड, नागपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. त्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. नेदरलॅण्डमधील अ‍ॅमस्टरडॅम या शहरात वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प प्रभावीपणे सुरू आहे. त्याची मदत राज्यातील महापालिकांना होणार आहे.