शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

निविदांचा खेळ चाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:41 IST

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला.

कल्याण : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. त्यामुळे ती उघडलेली नाही. आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. यावेळी एक कंपनी जरी आली, तरी तिच्याशी वाटाघाटी करून तिला प्रकल्पाचे काम देण्याचा मानस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे. मार्चपासून प्रकल्पाच्या निविदेचा खेळ सुरू असल्याने तिसरा प्रयत्न तरी यशस्वी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.कचºयापासून वीजनिर्मितीसाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे आग्रही होते. १८ मार्च २०१८ ला या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, निविदापूर्व बैठकीत ट्रान्सपरंट टीएकएनएम मलेशिया, जिंदाल अर्बन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया पॉवर लिमिटेड, खागा एनर्जी, ग्रीन लॉजिक्स, स्टेफिल नेक्डलॅण्ड, बायो क्लीन सिस्टीम, डेक्कन माइन, इन्फिनिटी या कंपन्यांनी कल्याणमध्ये कचºयापासून वीजनिर्मितीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महापालिका या प्रकल्पासाठी उंबर्डे येथे जागा देणार होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका हद्दीतील ५०० मेट्रीक टन घनकचºयावर प्रक्रिया करून त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या मान्यतेने महावितरण कंपनीस दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी केडीएमसीकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळणार नाही. त्यामुळे प्रतियुनिट ५.५० रुपयांनी वीजखरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. काही अटीशर्तीमुळे एकाही कंपनीने निविदा भरली नाही. त्यामुळे निविदेची पहिला फेरी वाया गेली. महापालिकेने दुसºयांदा निविदा मागवली. ही निविदा मागवताना काही अटीशर्ती शिथिल केल्या, तरीही त्याला एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आणखी एक महिना जाणार आहे.नेदरलॅण्डशी सामंजस्य करारवेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रस्तावित असताना राज्य सरकारने नेदरलॅण्ड सरकारशी पाणी, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत नागरी नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन तयार व्हावा, याकरिता सामंजस्य करार २३ मे रोजी केला आहे. या कराराची बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झाली. कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, ठाणे, पिंपरी-चिंडवड, नागपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. त्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. नेदरलॅण्डमधील अ‍ॅमस्टरडॅम या शहरात वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प प्रभावीपणे सुरू आहे. त्याची मदत राज्यातील महापालिकांना होणार आहे.