शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

निविदांचा खेळ चाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:41 IST

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला.

कल्याण : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसºयांदा मागवलेल्या निविदेस केवळ एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. त्यामुळे ती उघडलेली नाही. आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. यावेळी एक कंपनी जरी आली, तरी तिच्याशी वाटाघाटी करून तिला प्रकल्पाचे काम देण्याचा मानस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे. मार्चपासून प्रकल्पाच्या निविदेचा खेळ सुरू असल्याने तिसरा प्रयत्न तरी यशस्वी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.कचºयापासून वीजनिर्मितीसाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे आग्रही होते. १८ मार्च २०१८ ला या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, निविदापूर्व बैठकीत ट्रान्सपरंट टीएकएनएम मलेशिया, जिंदाल अर्बन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया पॉवर लिमिटेड, खागा एनर्जी, ग्रीन लॉजिक्स, स्टेफिल नेक्डलॅण्ड, बायो क्लीन सिस्टीम, डेक्कन माइन, इन्फिनिटी या कंपन्यांनी कल्याणमध्ये कचºयापासून वीजनिर्मितीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महापालिका या प्रकल्पासाठी उंबर्डे येथे जागा देणार होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका हद्दीतील ५०० मेट्रीक टन घनकचºयावर प्रक्रिया करून त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या मान्यतेने महावितरण कंपनीस दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी केडीएमसीकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळणार नाही. त्यामुळे प्रतियुनिट ५.५० रुपयांनी वीजखरेदी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. काही अटीशर्तीमुळे एकाही कंपनीने निविदा भरली नाही. त्यामुळे निविदेची पहिला फेरी वाया गेली. महापालिकेने दुसºयांदा निविदा मागवली. ही निविदा मागवताना काही अटीशर्ती शिथिल केल्या, तरीही त्याला एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिसºयांदा निविदा मागवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आणखी एक महिना जाणार आहे.नेदरलॅण्डशी सामंजस्य करारवेस्ट टू एनर्जी प्रकल्प प्रस्तावित असताना राज्य सरकारने नेदरलॅण्ड सरकारशी पाणी, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत नागरी नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन तयार व्हावा, याकरिता सामंजस्य करार २३ मे रोजी केला आहे. या कराराची बैठक मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झाली. कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, ठाणे, पिंपरी-चिंडवड, नागपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. त्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. नेदरलॅण्डमधील अ‍ॅमस्टरडॅम या शहरात वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प प्रभावीपणे सुरू आहे. त्याची मदत राज्यातील महापालिकांना होणार आहे.