शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डम्पिंगवर प्लास्टिकचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले, ठाणे महानगरपालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 01:42 IST

ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईमुळे ठाण्यातून प्लास्टिक जवळजवळ हद्दपार होत असल्याचे चित्र असून त्याच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईमुळे ठाण्यातून प्लास्टिक जवळजवळ हद्दपार होत असल्याचे चित्र असून त्याच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत. गेल्या काही महिन्यांत मल्टीलेअर प्लास्टिकनिर्मितीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन सर्वाधिक याच प्रकारचे प्लास्टिक हे डम्पिंगवर जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांनंतर अशा प्रकारचे ५० टक्के प्लास्टिक डम्पिंगवर जाणे बंद झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. याशिवाय, विविध प्रकारच्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासदेखील करण्यात येणार असून यामध्ये प्लास्टिकवर प्रक्रि या करणाऱ्या अनेक कंपन्यांबरोबर पालिकेने समन्वय साधला आहे.प्लास्टिक संकलनासाठी पालिकेने चार विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून प्रत्येक प्रभागात १५ दिवसांनी या माध्यमातून प्लास्टिक संकलन केले जाते. प्लास्टिकबंदी ही पालिका स्तरावर न राहता प्लास्टिक संकलन करणाºया आणि त्यासंदर्भात जनजागृती करणाºया विविध प्रकारच्या सामाजिक संस्था आणि संकलित केलेल्या प्लास्टिकवर प्रोसेसिंग करणाºया विविध कंपन्यांना प्लास्टिकबंदीच्या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे काम पालिका प्रशासनाने केले असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण विभागाने दिली. पालिकेने वारंवार केलेल्या कारवायांमुळे ठाण्यात प्लास्टिकबंदीची मोहीम काही प्रमाणात यशस्वी झाली आहे. मात्र, केवळ एकाच प्रकारचे प्लास्टिक संकलित होत नसल्याने प्रत्येक प्रकारच्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो, अशी संकल्पना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मांडली. त्यानुसार, पालिका स्तरावरदेखील यासंदर्भात काम सुरू केले आहे. मात्र, यामध्ये मल्टीलेअर प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्याने ते कमी करण्यासाठी पालिकास्तरावर प्रयत्न केला असल्याने अशा प्रकारचे प्लास्टिकचे विघटन करण्यास कठीण असल्याने हेच प्रमाण कमी केले पालिकेने स्पष्ट केले आहे.दुसरीकडे प्लास्टिक संकलनासाठी चार विशेष गाड्यांची सुविधा केली असून नौपाडा, वर्तकनगर आणि कळव्यात लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाने दिली. यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे प्रदूषण विभागाने स्पष्ट केले आहे.२०१९ मध्ये ५.७ टन प्लास्टिक जप्तदरम्यान, महापालिकेने केलेल्या कारवाईत २०१९ मध्ये ५.७ टन प्लास्टिक जप्त करून एक लाख ९० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाºया असून पर्यावरणास हानिकारक आहेत. त्यांची विक्र ी आणि वापर दोन्ही बेकायदा असून त्यांचा वापर करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्यांदा आढळल्यास पाच हजार दंड, दुसºयांदा आढळल्यास १० हजार आणि तिसºयांदा आढळल्यास २५ हजार तसेच तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीthaneठाणे