शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ग्लासचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:46 IST

पर्यावरण संतुलन राखण्याच्या अनुषंगाने कल्याणजवळील वरप येथे पार पडलेल्या वृक्षलागवडीच्या महामोहीम कार्यक्रमाच्या सभामंडपातच प्लास्टिकच्या ग्लासांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर झाल्याने प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने झाल्याचे पाहावयास मिळाले.

कल्याण : पर्यावरण संतुलन राखण्याच्या अनुषंगाने कल्याणजवळील वरप येथे पार पडलेल्या वृक्षलागवडीच्या महामोहीम कार्यक्रमाच्या सभामंडपातच प्लास्टिकच्या ग्लासांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर झाल्याने प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने झाल्याचे पाहावयास मिळाले.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. हा कार्यक्रम राज्य सरकारचा तसेच मोहिमेच्या उद्घाटनाचा असल्याने कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार आदींनी आवर्जून उपस्थिती लावली होती. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर उभारण्यात आलेल्या सभामंडपात मान्यवरांची भाषणे झाली. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याची बाटलीही या मंडपात नेण्यास मज्जाव केला जात होता. परंतु, ज्याठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तेथे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासचा सर्रासपणे वापर सुरू होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच प्लास्टिकबंदी धाब्यावर बसवली गेल्याचे दिसून आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नागपूरला जायचे आहे, असे सांगून १० मिनिटांचे भाषण करून ते निघाले. अन्य मान्यवरांची भाषणे झाली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी सभामंडप सोडल्यानंतर काहींनी काढता पाय घेतल्याने मागील खुर्च्या रिकाम्या झाल्या.२० मिनिटांसाठी विद्यार्थी ताटकळले दोन तासवृक्षलागवडीच्या महामोहिमेचा कार्यक्रम अवघ्या १५ ते २० मिनिटांत पार पडला; मात्र त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत उभे राहावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते.कार्यक्रम सकाळी ११ चा होता, परंतु सकाळी ९ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी तिष्ठत ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी ११.१५ च्या आसपास घटनास्थळी आगमन झाले.लागलीच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. साधारण २० मिनिटांमध्ये हा मुख्य कार्यक्रम उरकण्यात आला. परंतु, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना दोन तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले.ऐकलीचनाही कैफियतयेथील रहिवासी असलेल्या आदिवासी-कातकरी समाजाच्या हक्काच्या जमिनीवरील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने संबंधित समाजबांधव मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडणार होते; परंतु अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी भेट नाकारल्याचे समजते.

टॅग्स :thaneठाणे