शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आणीबाणीतील बंदीवानांचा सन्मान करण्याची योजना कायम ठेवावी, भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 15:09 IST

आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, चिटणीस संदीप लेले, हर्षदा बुबेरा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची आज भेट घेऊन निवेदन दिले.

ठाणे - आणीबाणीच्या कालावधीत बंदीवानांचा सन्मान करण्याची योजना बंद न करता कायम सुरू ठेवावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. त्याचबरोबर राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूधाचे दर व अनुदान वाढविण्याची मागणीही करण्यात आली.भाजपाचेठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, चिटणीस संदीप लेले, हर्षदा बुबेरा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची आज भेट घेऊन निवेदन दिले.

भारतीय लोकशाही कायम ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा कायम सन्मान व्हावा, या उद्देशाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीतील बंदीवानांसाठी सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेचे देशभरातून कौतूकही झाले होते. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या चांगल्या योजना बंद करण्याची मालिकाच सुरू झाली आहे. त्यानुसार आणीबाणीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून, लोकशाही कायम ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा अपमान करणारा आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला हा निर्णय अशोभनीय आहे, असे भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच लवकरात लवकर योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.दूध उत्पादकांसाठी साकडेराज्यात आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. गायीच्या दूधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान आणि दूध खरेदीचा दर प्रती लिटर ३० रुपये करावा आदी मागण्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणेPoliticsराजकारण