शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:56 IST

प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

ठाणे : विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, दुर्गा भागवत, धर्मकीर्ती सुमंत यासारख्या मोठ्या लेखकांचे लेखन मला जसे आवडले, तसे मला पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे लेखन आवडले नसेल. सगळे चांगले ते मीच प्रकाशित केले पाहिजे, असा माझा कधी आग्रह नव्हता. त्यांची पुस्तके छापली नाहीत म्हणून माझे काही फार नुकसानही झाले नाही, असे सांगत ज्येष्ठ प्रकाशक, लेखक, विचारवंत रामदास भटकळ यांनी पु. लं. आणि व. पु. यांची पुस्तके न छापण्यामागचे कारण विषद केले. निमित्त होते ‘लोकमत’ साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित त्यांच्या प्रकट मुलाखतीचे. प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

नेमाडेंपासून ग्रेसपर्यंत मोठमोठ्या लेखकांची पुस्तके तुम्ही छापलीत, पण पु. ल., व. पु. यांची पुस्तके का छापावीशी वाटली नाहीत? असा प्रश्न किशोर कदम यांनी करताच, भटकळ उत्तरले, ‘सगळे चांगले ते मीच केले पाहिजे, असा माझा कधीच आग्रह नव्हता. पु. लं.शी एक-दोनदा संबंध आला, मात्र पुढे काही कारणांनी त्यांनी त्यांची पुस्तके आम्हाला दिली नाहीत, परंतु मला कुणाबद्दल तसे काही बोलायचे नाही. अर्थात, त्यामुळे माझे काही फार नुकसान झाले नाही. प्रकाशकाने एका लेखकाची सगळी पुस्तके केली पाहिजेत, पण तसे ते अशक्य असते. तरीही कमी लिहिणाऱ्यांची पुस्तके एकाच प्रकाशकाने करावीत,’ असे माझे मत आहे.

‘ग्रंथाली’शी खोटं बोललो, किशोर कदम यांची कबुलीकिशोरच्या कविता जेव्हा ऐकल्या, तेव्हा मी धुंदीत गेलो. तेव्हा मी निवृत्त झालो होतो, पण मला त्याचे पुस्तक करायचेच होते, असे भटकळ यांनी म्हणताच, किशोर कदम यांनी एक मोठी कबुलीच जाहीरपणे दिली. ते म्हणाले, ‘खरंतर मी माझे पुस्तक ग्रंथालीला दिले होते, पण भटकळ साहेबांच्या प्रेमळ दबावामुळे मी ग्रंथालीशी खोटे बोलून ते पुस्तक परत घेतले आणि पॉप्युलरला दिले.’ त्यावर भटकळ त्वरित मिश्कीलपणे म्हणाले, ‘कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक ही ओळख नकोय मला...’

बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नकानिवृत्त झाल्यावर गाणं शिकावंसं वाटलं, असं का? असा प्रश्न करताच भटकळ म्हणाले, ‘शाळेत असतानाही मी गाणं शिकत होतो, पण नंतर नंतर ते मागे पडलं. मुलं मोठी होत होती. मला जमलं नाही. मुलांनी तरी गाणं शिकावं, असं वाटत होतं.’ सत्यजीत सतार शिकत होता. तेव्हा तो मला म्हणाला, ‘बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नका...’ एरव्ही बाप मुलाला सांगतो, पण इथे मुलाने बापाला सांगितलं होतं. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा सुरुवात केली, तेव्हा मी ४५ वर्षांचा होतो.

असे भेटले ग्रेस आणि ना. धों. महानोर ‘नवे कवी नवी कविता’ याची सुरुवात कशी झाली, हे सांगताना भटकळ यांनी कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांची पुस्तके कशी प्रकाशित केली, त्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, ग्रेस, महानोर यांची पुस्तके प्रकाशित केली, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नव्हतो. 

ग्रेस यांची कविता मी छंदमध्ये वाचली. त्यांच्या दहा-पंधरा कविता एकत्र छापल्या होत्या. त्यावेळेस ग्रेस हे बाई की बुवा यातही वाद होते.  

‘नवे कवी नवी कविता’ ही जर मालिका केली तर खूप चांगले होईल, असे वाटू लागले. त्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली. त्यात वा. ल. कुलकर्णी, मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै होते. त्यांनीसुद्धा ग्रेस यांचेच नाव सांगितले. पुढे वा. ल. यांचे एक दिवस मला पोस्टकार्ड आले, ‘अरे, ना. धों. महानोर नावाचा एक नवीन मुलगा आहे. तू ताबडतोब त्यांना पत्र लिही. तसा तुम्हाला पुस्तक काढायला वेळ लागतो, पण याला वेळ न लावता त्याचे पुस्तक काढा.’ मग आम्ही लगेच ग्रेस आणि महानोर यांची पुस्तके ‘नवे कवी नवी कविता’ एक आणि दोन म्हणून प्रकाशित केली व त्यांची भेट ही पुष्कळ नंतर झाली. 

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्य