शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:56 IST

प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

ठाणे : विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, दुर्गा भागवत, धर्मकीर्ती सुमंत यासारख्या मोठ्या लेखकांचे लेखन मला जसे आवडले, तसे मला पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे लेखन आवडले नसेल. सगळे चांगले ते मीच प्रकाशित केले पाहिजे, असा माझा कधी आग्रह नव्हता. त्यांची पुस्तके छापली नाहीत म्हणून माझे काही फार नुकसानही झाले नाही, असे सांगत ज्येष्ठ प्रकाशक, लेखक, विचारवंत रामदास भटकळ यांनी पु. लं. आणि व. पु. यांची पुस्तके न छापण्यामागचे कारण विषद केले. निमित्त होते ‘लोकमत’ साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित त्यांच्या प्रकट मुलाखतीचे. प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

नेमाडेंपासून ग्रेसपर्यंत मोठमोठ्या लेखकांची पुस्तके तुम्ही छापलीत, पण पु. ल., व. पु. यांची पुस्तके का छापावीशी वाटली नाहीत? असा प्रश्न किशोर कदम यांनी करताच, भटकळ उत्तरले, ‘सगळे चांगले ते मीच केले पाहिजे, असा माझा कधीच आग्रह नव्हता. पु. लं.शी एक-दोनदा संबंध आला, मात्र पुढे काही कारणांनी त्यांनी त्यांची पुस्तके आम्हाला दिली नाहीत, परंतु मला कुणाबद्दल तसे काही बोलायचे नाही. अर्थात, त्यामुळे माझे काही फार नुकसान झाले नाही. प्रकाशकाने एका लेखकाची सगळी पुस्तके केली पाहिजेत, पण तसे ते अशक्य असते. तरीही कमी लिहिणाऱ्यांची पुस्तके एकाच प्रकाशकाने करावीत,’ असे माझे मत आहे.

‘ग्रंथाली’शी खोटं बोललो, किशोर कदम यांची कबुलीकिशोरच्या कविता जेव्हा ऐकल्या, तेव्हा मी धुंदीत गेलो. तेव्हा मी निवृत्त झालो होतो, पण मला त्याचे पुस्तक करायचेच होते, असे भटकळ यांनी म्हणताच, किशोर कदम यांनी एक मोठी कबुलीच जाहीरपणे दिली. ते म्हणाले, ‘खरंतर मी माझे पुस्तक ग्रंथालीला दिले होते, पण भटकळ साहेबांच्या प्रेमळ दबावामुळे मी ग्रंथालीशी खोटे बोलून ते पुस्तक परत घेतले आणि पॉप्युलरला दिले.’ त्यावर भटकळ त्वरित मिश्कीलपणे म्हणाले, ‘कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक ही ओळख नकोय मला...’

बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नकानिवृत्त झाल्यावर गाणं शिकावंसं वाटलं, असं का? असा प्रश्न करताच भटकळ म्हणाले, ‘शाळेत असतानाही मी गाणं शिकत होतो, पण नंतर नंतर ते मागे पडलं. मुलं मोठी होत होती. मला जमलं नाही. मुलांनी तरी गाणं शिकावं, असं वाटत होतं.’ सत्यजीत सतार शिकत होता. तेव्हा तो मला म्हणाला, ‘बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नका...’ एरव्ही बाप मुलाला सांगतो, पण इथे मुलाने बापाला सांगितलं होतं. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा सुरुवात केली, तेव्हा मी ४५ वर्षांचा होतो.

असे भेटले ग्रेस आणि ना. धों. महानोर ‘नवे कवी नवी कविता’ याची सुरुवात कशी झाली, हे सांगताना भटकळ यांनी कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांची पुस्तके कशी प्रकाशित केली, त्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, ग्रेस, महानोर यांची पुस्तके प्रकाशित केली, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नव्हतो. 

ग्रेस यांची कविता मी छंदमध्ये वाचली. त्यांच्या दहा-पंधरा कविता एकत्र छापल्या होत्या. त्यावेळेस ग्रेस हे बाई की बुवा यातही वाद होते.  

‘नवे कवी नवी कविता’ ही जर मालिका केली तर खूप चांगले होईल, असे वाटू लागले. त्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली. त्यात वा. ल. कुलकर्णी, मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै होते. त्यांनीसुद्धा ग्रेस यांचेच नाव सांगितले. पुढे वा. ल. यांचे एक दिवस मला पोस्टकार्ड आले, ‘अरे, ना. धों. महानोर नावाचा एक नवीन मुलगा आहे. तू ताबडतोब त्यांना पत्र लिही. तसा तुम्हाला पुस्तक काढायला वेळ लागतो, पण याला वेळ न लावता त्याचे पुस्तक काढा.’ मग आम्ही लगेच ग्रेस आणि महानोर यांची पुस्तके ‘नवे कवी नवी कविता’ एक आणि दोन म्हणून प्रकाशित केली व त्यांची भेट ही पुष्कळ नंतर झाली. 

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्य