शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे भरायला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने होत असलेल्या वाहतूककोंडीचा फटका वाहनांसह रुग्णवाहिकांनाही बसत होता. याबाबतचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शहरातील ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने होत असलेल्या वाहतूककोंडीचा फटका वाहनांसह रुग्णवाहिकांनाही बसत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ‘ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी’ या मथळ्याखाली प्रकाशित करताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या वृत्ताची दखल घेत मनपाच्या बांधकाम विभागाने उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली.

पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या नव्या कोपर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या पुलाच्या कामामुळे वाहतूक दोन वर्षांपासून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळवण्यात आली आहे. पावसाच्या सुरुवातीला जूनमध्ये या पुलाच्या ठिकाणी खड्डे पडले होते. ते मनपाकडून बुजविण्यात आले होते. परंतु, नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसात पूर्व-पश्चिम भागासह पुलाच्या मध्यभागीही मोठमोठे खड्डे पडले. खड्ड्यांमुळे येथील वाहतूक मंदावल्याने वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागत होते. वाहनांसह रुग्णवाहिकाही अडकून पडत असल्याने कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत होती.

दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच मनपाने खडीमिश्रित मुरुमाचा भराव टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही खडीमिश्रित मुरुम मात्र कितपत टिकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाने उघडीप देताच डांबरीकरणाने खड्डे भरून कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

-------------------