शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मीरा-भाईंदरमध्ये ३५ कोटींचा खर्च होऊनही खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी वर्षाला तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करीत आहे. तरीदेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी वर्षाला तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करीत आहे. तरीदेखील शहरातील सर्वच रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये रस्ते बांधणी आणि रस्ते पॅचवर्कच्या कामात रस्त्यांचा नसलेला समतोल, वापरलेल्या साहित्याचा सुमार दर्जा, तांत्रिक पद्धतीचा काटेकोर अवलंब न होणे, प्रत्यक्ष साहित्य व कामाच्या तुलनेत अंदाजपत्रकातील गडबड, तसेच टेंडरमधील टक्केवारीचे आरोप यामुळे खर्च वाया जात आहे.

मीरा-भाईंदरमध्ये ३०५ किमी लांबीचे डांबरी रस्ते आहेत, तर केवळ ११.५० किमी लांबीचे सिमेंट रस्ते व १.८ किमीचे कच्चे रस्ते आहेत. पावसाळ्यात दरवर्षी रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. पॅचवर्कचे काम एआयसी व गजानन कन्स्ट्रक्शन हे ठेकेदार करतात. गेल्या वर्षी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम एआयसीने केले होते, तर यंदाच्या वर्षी गजानन कन्स्ट्रक्शनला ३५ कोटींचे टेंडर मिळाले आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांत पॅचवर्कच्या ठेक्याची रक्कम कित्येक पटीने वाढली आहे. २०१२-२०१३ सालात १७ कोटी ५८ लाख रुपयांचा होणारा खर्च प्रचंड वाढून आता तब्बल ३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनसुद्धा रस्ते खड्डेयुक्त, नादुरुस्तच असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

..........

मीरा रोड-भाईंदर रस्ते बांधणी कंत्राटदार

श्रीजी कन्स्ट्रक्शन, गजानन कन्स्ट्रक्शन, आरएनबी इन्फ्रा, आशापुरा कन्स्ट्रक्शन, कंचन कन्स्ट्रक्शन, रिद्धिका एंटरप्रायजेस

............

रस्त्यावरील खड्डे बुजविणारे कंत्राटदार

गजानन कन्स्ट्रक्शन

...............