शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केडीएमसीच्या हद्दीतील खड्डे तुलनेत कमी खोल; अभियंत्याने तोडले अकलेचे तारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 00:30 IST

सभापतींनी दिले खड्डे बुजवण्याचे आदेश

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांप्रकरणी सामान्य नागरिकांमध्ये महापालिकेविरोधात संतापाची तीव्र भावना आहे. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे हे कमी खोलीचे असून, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यांवरील खड्डे हे जास्त खोल असल्याची माहिती दिली. शेळके यांनी अकलेचे तारे तोडल्याने स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. खड्डे त्वरित बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच खड्डे बुजविण्यात दिरंगाई करणाºया कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही दिला आहे.

स्थायी समितीत खड्ड्यांचा विषय चर्चेला आला असता शेळके यांनी खड्डे बुजविण्यापेक्षा कोणाच्या हद्दीत किती खोल खड्डे आहेत, याचे मोजमाप सांगण्यात धन्यता मानली आहे. कल्याण-डोंबिवलीतील काही रस्ते महापालिका हद्दीत, तर काही रस्ते राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत येतात. कल्याण-शीळ रस्ता हा कल्याण शहरातून जातो. परंतु, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाची आहे. कल्याण-मुरबाड रस्ता व कल्याण-खंबाळपाडा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो. डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्ते हे औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येतात. गतवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी पाच जणांचा मृत्यू हा महापालिका हद्दीतील रस्त्यांवर झालेला नाही, असा खुलासा करीत जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला होता. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून हद्द कोणाची, हे पाहत बसणार आहात का? लोकांचा जीव जात असताना हद्द न पाहता खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना केली होती. मात्र, यातून महापालिका अधिकाऱ्यांनी कोणताच धडा घेतलेला नाही, हे शेळके यांच्या विधानामुळे स्पष्ट होते.

रस्त्यांवर किती खड्डे आहेत, कोणते रस्ते खड्डेमय झाले आहे, खड्डे बुजविले गेले की नाही, आतापर्यंत किती खड्डे बुजविले आहेत, याचा तपशील शेळके यांनी देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ही माहिती न देता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीतील खड्डे हे जास्त खोलीचे आहेत, असे सांगून आपण कसे सुरक्षित आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न केला. कमी खोलीचे खड्डे आहेत, असा दावा केला जात असला तरी रस्त्यांवर खड्डे आहेत. ते बुजविणार कधी, हा मूळ मुद्दा आहे, याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवरील खड्डे कंत्राटदार बुजवितो की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी अशा प्रकारचे वक्तव्य करून सदस्यांना चिथावण्याचेच काम केल्याचे बोलले जात आहे.नवरात्रीपूर्वी तरी खड्डे बुजवणार का?गणपती आगमनापूर्वी खड्डे बुजविले जाणे अपेक्षित होते. मात्र, खड्डे बुजविले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच झाले. त्यानंतर दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकाही खड्डेमय रस्त्यांतून निघाल्या. आता नवरात्रीपूर्वी तरी खड्डे बुजविले जाणार आहेत का, असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका