शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खड्ड्यांमुळे होताहेत हाल; कल्याण-डोंबिवलीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:41 IST

वाहतुकीचा मंदावला वेग; नोकरदार त्रस्त

कल्याण : मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. खड्डे तातडीने बुजवावेत, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही मागणी करत असल्याने भरपावसात खड्डे बुजवण्याचे काम के ले जात आहे. पावसाने उघडीप घेतल्यावर खड्डे बुजवण्यात सातत्य हवे, याकडे नागरिक व वाहनचालकांनी लक्ष वेधले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहनसेवेच्या बस, रिक्षा, टॅक्सी, स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन नोकरदारवर्ग मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, ठाणे व मीरा-भार्इंदरपर्यंत प्रवास करीत आहे. तेथे जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना शीळ-कल्याण-भिवंडी या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.शीळ ते कोनगावदरम्यान बऱ्यापैकी काम झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधणे, मधल्या दोन लेनचे काम सुरू करणे, अशी कामे सुरू आहेत. तर, काही ठिकाणी हे काम झाले आहे. मात्र, काही ठिकाणी आजही डांबरी रस्ता अस्तित्वात आहे. या रस्त्यावरील दोन टोलनाक्यांवर जड, अवजड वाहनांकडून टोलवसुली केली जाते. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडुजी केली जात नाही, अशी वाहनचालकांची तक्रार आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नोकरदारांना मुंबई, ठाणे, पनवेल गाठणे कठीण होते. दररोज त्यांना दोन तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. काही वेळेस चार तासांचा वेळही खर्च होतो. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारीच या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. यापूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही या रस्त्याची पाहणी केली होती. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने सध्या भरपावसात खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे.कल्याण-शीळ रस्त्यावरील पत्रीपुलाशेजारील पुलावर दोन आठवड्यांपूर्वी खड्डे पडले होते. तेथे माती टाकून खड्डे बुजवल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तेथील खड्डे बुजवले होते. मात्र, सध्या पडणाºया पावसामुळे पुन्हा पुलावर खड्डे पडले आहेत.डोंबिवली एमआयडीसी परिसर, मानपाडा रस्त्यावर काही ठिकाणी तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडलेले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण झाली असून, त्याकडे एमआयडीसी व के डीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. खड्डे त्वरित बुजविले जातील, असे आश्वासन महापालिका व एमआयडीसीकडून दिले जात आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेतील डांबरी रस्त्यांवरही खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट आहे.केडीएमसीने खड्डे बुजवण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागच्या वर्षीही १७ कोटी खर्च झाले होते. मात्र, किती खड्डे बुजविले, याचा हिशेब मनपाने अद्याप दिलेला नाही. दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असतानाही नागरिकांना पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांतून प्रवास करावा लागतो. प्रसंगी अपघाताला तोंड द्यावे लागते. काही वेळेस जीव गमाविण्याची वेळ येते.२७ गावांतील रस्त्यांची कामे रखडलीमागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली होती. त्यात २७ गावांतील रस्ते वाहून गेले होते. त्यामुळे तेथील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ३२७ कोटी रुपये मागितले होते. मात्र, तेही सरकारकडून प्राप्त झाले नाही. राज्यात सत्तांतर झाल्यावरही या मागणीचा विचार झालेला नाही.आता तर २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना आयुक्तांनी १८ गावांतील विकासकामे स्थगित केली आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय मार्गी लागून नवी नगर परिषद स्थापन होत नाही, तोपर्यंत रस्ते विकास होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Potholeखड्डे