शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

खड्ड्यांमुळे होताहेत हाल; कल्याण-डोंबिवलीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:41 IST

वाहतुकीचा मंदावला वेग; नोकरदार त्रस्त

कल्याण : मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. खड्डे तातडीने बुजवावेत, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही मागणी करत असल्याने भरपावसात खड्डे बुजवण्याचे काम के ले जात आहे. पावसाने उघडीप घेतल्यावर खड्डे बुजवण्यात सातत्य हवे, याकडे नागरिक व वाहनचालकांनी लक्ष वेधले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहनसेवेच्या बस, रिक्षा, टॅक्सी, स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन नोकरदारवर्ग मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, ठाणे व मीरा-भार्इंदरपर्यंत प्रवास करीत आहे. तेथे जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना शीळ-कल्याण-भिवंडी या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.शीळ ते कोनगावदरम्यान बऱ्यापैकी काम झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधणे, मधल्या दोन लेनचे काम सुरू करणे, अशी कामे सुरू आहेत. तर, काही ठिकाणी हे काम झाले आहे. मात्र, काही ठिकाणी आजही डांबरी रस्ता अस्तित्वात आहे. या रस्त्यावरील दोन टोलनाक्यांवर जड, अवजड वाहनांकडून टोलवसुली केली जाते. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडुजी केली जात नाही, अशी वाहनचालकांची तक्रार आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नोकरदारांना मुंबई, ठाणे, पनवेल गाठणे कठीण होते. दररोज त्यांना दोन तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. काही वेळेस चार तासांचा वेळही खर्च होतो. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारीच या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. यापूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही या रस्त्याची पाहणी केली होती. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने सध्या भरपावसात खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे.कल्याण-शीळ रस्त्यावरील पत्रीपुलाशेजारील पुलावर दोन आठवड्यांपूर्वी खड्डे पडले होते. तेथे माती टाकून खड्डे बुजवल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तेथील खड्डे बुजवले होते. मात्र, सध्या पडणाºया पावसामुळे पुन्हा पुलावर खड्डे पडले आहेत.डोंबिवली एमआयडीसी परिसर, मानपाडा रस्त्यावर काही ठिकाणी तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडलेले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण झाली असून, त्याकडे एमआयडीसी व के डीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. खड्डे त्वरित बुजविले जातील, असे आश्वासन महापालिका व एमआयडीसीकडून दिले जात आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेतील डांबरी रस्त्यांवरही खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट आहे.केडीएमसीने खड्डे बुजवण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागच्या वर्षीही १७ कोटी खर्च झाले होते. मात्र, किती खड्डे बुजविले, याचा हिशेब मनपाने अद्याप दिलेला नाही. दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असतानाही नागरिकांना पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांतून प्रवास करावा लागतो. प्रसंगी अपघाताला तोंड द्यावे लागते. काही वेळेस जीव गमाविण्याची वेळ येते.२७ गावांतील रस्त्यांची कामे रखडलीमागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली होती. त्यात २७ गावांतील रस्ते वाहून गेले होते. त्यामुळे तेथील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ३२७ कोटी रुपये मागितले होते. मात्र, तेही सरकारकडून प्राप्त झाले नाही. राज्यात सत्तांतर झाल्यावरही या मागणीचा विचार झालेला नाही.आता तर २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना आयुक्तांनी १८ गावांतील विकासकामे स्थगित केली आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय मार्गी लागून नवी नगर परिषद स्थापन होत नाही, तोपर्यंत रस्ते विकास होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Potholeखड्डे