शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

लोकानुनयाचा १५८ कोटींचा खड्डा

By admin | Updated: January 24, 2017 05:52 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ताकरातून मुक्ती देण्याच्या शिवसेनेच्या लोभसवाण्या घोषणेमुळे

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ताकरातून मुक्ती देण्याच्या शिवसेनेच्या लोभसवाण्या घोषणेमुळे महापालिका तिजोरीवर किमान १५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या घोषणेला काटशह देण्याकरिता भाजपा अनधिकृत इमारतींकडून आकारण्यात येणारी शास्ती रद्द करण्याच्या खटपटीत आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ८ ते १० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सत्ता काबीज करण्याकरिता दोन्ही पक्षांकडून सुरू असलेला लोकानुनय एकतर महापालिकेच्या आर्थिक मुळावर येणार आहे किंवा केवळ सत्ता मिळवण्याकरिता भूलथापा मारण्यात येत आहेत, असे जाणकारांचे मत आहे.राज्यातील सत्ताधारी भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचा आग्रह धरत असताना त्यांचा पक्ष अनधिकृत इमारतींची शास्ती रद्द करणार असेल, तर अगोदरच बेकायदा बांधकामांनी पोखरलेल्या ठाण्यात आणखी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटण्याची भीती नगररचना क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये ‘अच्छे दिन’, ‘इंडिया शायनिंग’, ‘फिल गुड’ अशा लोभसवाण्या संकल्पना भाजपाने पुढे आणल्या. शिवसेनेने १९९५ पूर्वी झोपडपट्टीवासीयांना मोफत घरांची योजना जाहीर केली. आताही त्याच लोकानुनयाच्या मळलेल्या वाटेवरून शिवसेना, भाजपा हे जात आहेत. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांकडून शास्ती वसूल करण्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून बराच गाजत आहे. ही शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेनेने दिव्यात जल्लोष साजरा केला होता. मात्र, अद्याप शास्ती रद्द झाली नसल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. अर्थात, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील शास्ती रद्द करण्याच्या तयारीत सरकार असून अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ केल्याची घोषणा केली. या घोषणेलाी नगरविकास खात्याची मंजुरी लागेल. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार शिवसेनेची गोची करण्याकरिता या घोषणेला मान्यता देणार किंवा कसे, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने शेतकऱ्यांना संपूर्ण वीजमाफी देण्याची घोषणा केली. लागलीच तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ती घोषणा अमलात आणून शिवसेनेच्या घोषणेतील हवा काढून टाकली. प्रत्यक्षात, केवळ निवडणुकीनंतर दोनतीन महिने ही वीजमाफी अमलात आणली गेली. मालमत्ताकरमाफी व शास्तीमाफी या दोन्ही घोषणा केवळ सत्ता हस्तगत करण्यापुरता केल्या जाणार की, खरोखर दीर्घकाळ अमलात येणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.