शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

लोकानुनयाचा १५८ कोटींचा खड्डा

By admin | Updated: January 24, 2017 05:52 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ताकरातून मुक्ती देण्याच्या शिवसेनेच्या लोभसवाण्या घोषणेमुळे

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ताकरातून मुक्ती देण्याच्या शिवसेनेच्या लोभसवाण्या घोषणेमुळे महापालिका तिजोरीवर किमान १५० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या घोषणेला काटशह देण्याकरिता भाजपा अनधिकृत इमारतींकडून आकारण्यात येणारी शास्ती रद्द करण्याच्या खटपटीत आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ८ ते १० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सत्ता काबीज करण्याकरिता दोन्ही पक्षांकडून सुरू असलेला लोकानुनय एकतर महापालिकेच्या आर्थिक मुळावर येणार आहे किंवा केवळ सत्ता मिळवण्याकरिता भूलथापा मारण्यात येत आहेत, असे जाणकारांचे मत आहे.राज्यातील सत्ताधारी भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचा आग्रह धरत असताना त्यांचा पक्ष अनधिकृत इमारतींची शास्ती रद्द करणार असेल, तर अगोदरच बेकायदा बांधकामांनी पोखरलेल्या ठाण्यात आणखी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटण्याची भीती नगररचना क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये ‘अच्छे दिन’, ‘इंडिया शायनिंग’, ‘फिल गुड’ अशा लोभसवाण्या संकल्पना भाजपाने पुढे आणल्या. शिवसेनेने १९९५ पूर्वी झोपडपट्टीवासीयांना मोफत घरांची योजना जाहीर केली. आताही त्याच लोकानुनयाच्या मळलेल्या वाटेवरून शिवसेना, भाजपा हे जात आहेत. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांकडून शास्ती वसूल करण्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून बराच गाजत आहे. ही शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेनेने दिव्यात जल्लोष साजरा केला होता. मात्र, अद्याप शास्ती रद्द झाली नसल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. अर्थात, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील शास्ती रद्द करण्याच्या तयारीत सरकार असून अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ केल्याची घोषणा केली. या घोषणेलाी नगरविकास खात्याची मंजुरी लागेल. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार शिवसेनेची गोची करण्याकरिता या घोषणेला मान्यता देणार किंवा कसे, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने शेतकऱ्यांना संपूर्ण वीजमाफी देण्याची घोषणा केली. लागलीच तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ती घोषणा अमलात आणून शिवसेनेच्या घोषणेतील हवा काढून टाकली. प्रत्यक्षात, केवळ निवडणुकीनंतर दोनतीन महिने ही वीजमाफी अमलात आणली गेली. मालमत्ताकरमाफी व शास्तीमाफी या दोन्ही घोषणा केवळ सत्ता हस्तगत करण्यापुरता केल्या जाणार की, खरोखर दीर्घकाळ अमलात येणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.