शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नशेबाजांच्या दगडफेकीने प्रवासी झाले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:18 IST

मध्य रेल्वेच्या जलदमार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पारसिक बोगद्याजवळ फेकण्यात येणाऱ्या दगड आणि तत्सम वस्तूंमुळे गेल्या महिन्यात लोकलच्या दारात उभ्या असलेल्या तीन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.

ठाणे : मध्य रेल्वेच्या जलदमार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पारसिक बोगद्याजवळ फेकण्यात येणाऱ्या दगड आणि तत्सम वस्तूंमुळे गेल्या महिन्यात लोकलच्या दारात उभ्या असलेल्या तीन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासाअंती या वस्तू नशा केल्यानंतर बेभान झालेले काही तरुण फेकत असल्याचे समोर आहे. त्यापैकी चार तरुणांची ओळख पुढे आली असून अद्याप त्यांना अटक करण्यात यश आले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.मार्च महिन्यात मध्य रेल्वेच्या जलदमार्गावरील पारसिक बोगद्याजवळच लोकलवर दगड फेकले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या. तसेच या दगडफेकीमुळे तीन महिला जखमी झाल्याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक गुन्हा हा कल्याण रेल्वे पोलिसांकडून ठाणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे या परिसरातल्या झोपडपट्टीतील काही तरुण नशेच्या आहारी गेले असून ते नशेत बेभान झाल्यावर हाताला मिळेल, ती वस्तू फेकतात. त्यांनी फेकलेल्या अशा वस्तूंमुळे तीन महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेल्वे परिसरातील घटनांची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात होते. तर, रेल्वेच्या मालमत्तेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची आहे. त्यामुळे रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी दोन्ही प्रशासनाकडे आहे. त्यांनी या परिसरात आपली गस्त वाढवून हे प्रकार कसे रोखता येईल, यांची चाचपणी करणे गरजेचे आहे. मात्र, यासारख्या घटना घडत असताना लोहमार्गाव्यतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यांचा धाक नसल्याने, कारवाईची भीती नसल्याने असे प्रकार वाढत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.>टेकडीवर नशेची मैफलरेल्वेमार्गावरील पारसिक बोगद्याजवळ वाघोबानगर टेकडी आहे. तेथे असलेल्या क चराकुंडी परिसरात नशा करणाºया तरुणांची मैफल बसते. ते कपड्यात सुळो घेऊन ओढतात. नशेच्या आहारी गेलेल्या काही तरुणांपैकी चार जणांची ओळख पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली.>उंच सुरक्षा भिंत बांधण्याची मागणीरेल्वेलाइनच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन झोपडपट्ट्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यातच, या परिसरात गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शाळांना सुट्या लागल्याने या परिसरात राहणारी बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात रेल्वेलाइनजवळ खेळताना दिसत आहे. यामुळे रेल्वेसह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उंच सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी पुढे येत आहे. ती उभारल्यावर रेल्वेलाइनवर कचराही कमी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.